Thursday 24 July 2014

प्रियांश...४३

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेटलेल्या एका मैत्रिणीशी गप्पा झाल्या, वोट्सअप्प वर आल्याची कुनकुन तिला मिळाली अन गप्पांचा ओघ सुरु झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हिच्याकडून गुजराती शिकण्याचा फोल प्रयत्नही करुन झाला होता. नोकरी मिळाली, पायवाटा वेगळ्या झाल्या, फेसबुकवर तिच्या लग्नाचे फोटो अपलोड झाल्यावर जाणवल, की मैडमच लग्न झाल, मग काय, फेसबुकवरच शुभेछ्या दिल्या. पर्याय नव्हता, शेवटी मनाला माझ्याही कुठेतरी लागल होतच. असो हा सारा भूतकाळ!

प्रत्येक विवाहीत स्त्री फिरून फिरून ''सा" नावाच्या शब्दावर येऊन अशी काही अटकते की तो धड तिला धरताही येत नाही अन सोडताही! पण, शेवटी सोडते वेळी ती तो "सू" लाऊनच सोडते. असो, काळ बदलला तरीही स्त्रियांची मानसिकता बदलणार नाही हेच खर! तसच हिच्या बाबतीतही झाल. शिकलेली, नोकरी केलेली, देखणी सखी सून म्हणून गेली पण, सोन्याच्या पिंजरयात कैद झाली. नोकरी करायची नाही, कारण, त्यांच्या घरात हे आवडत नाही...मग, क्लासेस घेते तर, बाहेरच्या माणसांनी घरात आलेल चालणार नाही...नवरयाशी बोलते तर तो मुका गडी! बायकोला अटलिस्ट तिच्या खर्चासाठी महिन्याचे पैसे द्यायचे, तर हा पठया तेही करत नाही...स्वत: कमवणारया सखीवर काय ही वेळ? नव्या घरात पहिला हक्काचा माणुस असतो तो नवरा, त्याच्याकडेच ती काही लागल, खुपल सांगणार ना की शेजारयाला? माहेरी आलेल्या बायकोला रिकाम्या हाताने जाऊ द्यायच? ही कोणती पद्धत, आपल्या बायकोला काही आवडले, आपल्या बाळाला काही पाहिजे असेल तर, काय? माहेरही तिच्या हक्काच आहे, पण एक नवरा, बाप, जावई म्हणून त्याच काही कर्तव्य आहे की नाही? एक मुलगा म्हणून तो चांगला नक्कीच वागतोय पण, मग बाकीच्या नात्यांवर इतका अन्याय का??

एका परक्या मुलीला तुम्ही सून म्हणून घरी मापट ओलांडून आणता, मग तिला माणुस म्हणूनही वागवा. कारण, ती सुध्हा कोणाच तरी एकुलत एक पाखरुच असते ना हो!  ती काही पाळलेल कुत्र-मांजर नसते, चक्क मन असणारी तुमच्या आई, बहिणी, मुली सारखीच एक स्त्री असते. शेवटी ती मला एक सल्ला देऊन गेली, अरेंज मैरेज करुच नकोस, सार क्लियर करून मगच लग्न कर...अन तिच एक वाक्य अजुनही मला काळजात खुपत आहे, "मी तर अजिबात प्रेम करत नाही याच्याशी, माझ फ़क्त शरीर त्याच्याजवळ आहे, आत्मा नाही." काय म्हणाल याला, तीन वर्षापेक्षा जास्ती होऊन गेले तिच्या लग्नाला अन किती भयानकता आहे ही लग्न नावाच्या पवित्र नात्यातील!

हे झाल लग्नानंतरच, लग्नाआधीच काही नमुने सुरु होतात, लग्नानंतरही तुला जॉब करावा लागेल, घरी पण पहाव लागेल, आमच्या घरी कुकच्या हातच चालत नाही त्यामुळे तुलाच कराव लागेल, जस बायको नको कामवाली बाई हवी असते यांना, जी नॉन स्टॉप पायाला चाके लाऊन फिरेल...आणि काय तर तुझा जॉब टाइमिंग कमी करून घ्यावा लागेल, जशी कंपनी याच्या बापाचीच आहे ना! तुला नॉनवेज सोडाव लागेल, घरी कोणी खात नाही, बाहेर खाऊ शकतेस! अरे वाह रे बापुड्या जर ती वेजी असेल तर मात्र तुला पंचाईत, तुला शिकाव लागेल अन खावही लागेल,... हाउस वाईफ बनुन रहायच नाही, अरेच्या म्हणजे घर मैनेज करण तुच्छ काम आहे का? घर सांभाळायलाही डोक लागत, कोणत्याही ऐरया गैरयाच काम नाही ते, मुलांच्या मागे धावण, चिऊ माऊ करत जेवू घालण, त्यांना लहानाच मोठ करण, स्वत:च्या पायावर उभ करण, चेष्टा वाटतेय का ही?

लग्न दोन जीवांच मिलन, पण, त्यात दोन कुटुंब पण सामील असतात, एकमेकांना सावरून, नवीन नाती जुळवायची असतात...जुन्या नात्यांना नवीन परिघ द्यायचा असतो अन नव्या नात्यांना त्यात सामील करायच असत...हे गमक ज्याला आल त्याच्या घरी स्वर्गच नांदेल हे मात्र नक्की! डोळे झाकून बसू नका मित्रांनो परिघ वाढवा...

प्रिया सातपुते

Saturday 19 July 2014

माझं फुलपाखरू


आज माझ्या फुलपाखराने अचानक मला एक प्रश्न केला, "आतु, फक्त गोरी माणसेच चांगली असतात का?" तो प्रश्न ऐकून मला थोडं खटकलच, कारण, अशीच वेगवेगळी वाक्यं माझ्या कानावर आली होती. बाहेर जाताना, जेव्हा मी तयार होऊन, एखादा प्रश्न विचारते, "कशी दिसतेय मी?" त्यावर तिचं आधी उत्तरं असायचं, तेही हसून, "खूप छान, तू छानच दिसतेस, किंवा वॉव, क्युट…" पण, हल्ली हे उत्तर थोडं बदललं होत, "ह्म्म्म तू गोरीच आहेस ना, मग छानच दिसणार…" आधी माझं लक्षच गेलं नाही! पण, काही दिवसांपूर्वी ती आणि तिचा मित्र माझ्यासोबत खेळत होते, तितक्यात मला वोटसअप्प वर मेसेज आला, तर माझ्या एका सिनियरने तिच्या बाळाचे फोटो शेयर केले होते, त्या बाळाला पाहून, तिचा मित्र झटकन बोलून गेला, "शी, काळ बेबी आहे." त्यावर मला खटकल, मी त्याला समजावून सांगितल, "अरे! बेबी सगळे क्युटच असतात, त्यात काळ-गोर असा भेदभाव नसतो. सगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या रंगाची माणसे असतात, मग बेबी पण तशेच असतात, आता तू पण तर दुधाच्या शाईसारखा गोरा नाहीयेस ना? तुझ्यापेक्षा पण, कोणीतरी गोर असेलच ना? मग, त्याने तुला काळा मुलगा म्हणून चिडवलं तर ते तुला चालेल का?" यावर तो नाही म्हणून गप्प झाला पण फुलपाखराच्या चेहऱ्यावर प्रश्नाचं जाळ स्पष्ट दिसतं होत, तिला विचारलं पण, तेव्हा ती काहीच बोलली नाही. 

आज संधी सापडली होती, तिचा सुद्धा मूड मस्त होता, त्याचाच फायदा घेत मी तिला विचारलं, "त्रिशू, तुला कोणी काही बोललं आहे का?" 
माझं फुलपाखरू उडता उडताच म्हणाल, "नाही आतु"… 
मी- मग तू असा प्रश्न का विचारलास? नक्कीच कोणीतरी बोललं हो ना?
त्रिशू- ह्म्म्म, अग शाळेत तो  ***(मला इथे नाव टाकायचं नाही, कारण, एखाद्या लहान मुलाच नाव टाकण्याची माझी मुळीच इच्छा नाही!) आहे ना, त्याने मला, काळी म्हंटल, तो जास्ती गोरा आहे ना म्हणून तो सगळ्यांना काळच म्हणतो, अन मग मला वाईट वाटत, मी गोरी नाही ना म्हणून, बघ ना नेहा दीदी, रिया, वेदांत, टीया टीशा सगळे गोरे आहेत, आणि मीच फक्त काळी आहे, तू पण गोरी आहेस… 
एवढ सगळ बोलू पर्यंत या सात वर्षाच्या पाखराचा चेहरा केवढूसा झाला. तिचं सार ऐकून, मला पोटात गोळा आल्यासारखंच झालं. मग, मी म्हणाले, "कोण म्हणालं तुला काळी आहेस, तू खूप सुंदर, स्मार्ट आहेसं, बघ तुझे डोळे, किती बोलके आहेत, त्यांच्यात फक्त प्रेमच दिसतं. आणि तू व्हीटीश आहेस, काळी नाही… 
त्रिशू- व्हीटीश म्हणजे?
मी चक्रावलेच आता रंगांच्या चक्रात मला पडायचं नव्हत कारण मला तिच्यातला न्यूनगंड काढून टाकायचा होता रंगभेदाला खतपाणी न घालता. 
मी- अरे बाबा, आधी मला सांग, तुला कसं कळाल कि फक्त गोरी माणसेच चांगली असतात? 
यावर ती गप्प राहिली. 
मी- रंगाने माणूस चांगला की वाईट हे ठरवायचं नसतं बाळा, आता मग बाबा आणि पप्पा काळे आहेत म्हणून ते वाईट झाले का?
यावर ती पटकन बोलली, "नाही, ते खूप छान आहेत, आपल्यावर किती प्रेम करतात, आपल्याला खाऊ आणतात, खूप काम करतात, बिलकूल दमत नाहीत,… 
तिच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागसपणा मला खाऊन टाकावासा वाटला. 
मी- माणूस चांगला त्याच्या गुणांनी होतो. 
त्रिशू- गुण म्हणजे?
मी- गुण म्हणजे गुड हबिटस, आता सांग मला गुड हबिटस काय असतात ते?
त्रिशू- सकाळी लवकर उठण, ब्रश करण, पॉटी करण, अंघोळ करण, स्कूल ला जाण, अभ्यास करण, मोठ्यांचा आदर करण,… 
मी- हे सगळे करणाऱ्याला कोण म्हणतो आपण? गुड गर्ल ऑर गुड बॉय! 
त्रिशू- हो
मी- मग, इथे कुठे रंग आहे??
त्रिशू- नाही (हसून)
मी- कावळा कोणत्या रंगाचा असतो?
त्रिशू- काळ्या!
मी- तुला ती गोष्ट माहितेय ना? पक्ष्यांना तहान लागलेली असते आणि सगळे सुंदर पक्षी माठातलं पाणी पिऊ शकत नाहीत, पण, कावळा काय करतो तेव्हा?
त्रिशू- तो दगड टाकतो, मग पाणी वर येते, आणि मग तो पाणी पितो. 
मी- मग, कावळा काळा असूनपण पाणी पितो का?
त्रिशू- कारण कि तो स्मार्ट असतो
मी- शाबास! म्हणजे रंगापेक्षा काय महत्वाच आहे? बुद्धी!
तिच्या डोळ्यांमध्ये लकाकी स्पष्टपणे दिसत होती. 
मी- अजून एक गोष्ट सांगते, एकदा अर्जुन, भगवान कृष्णांना प्रश्न विचारतो, "चांगल म्हणजे काय? अन वाईट म्हणजे काय? मग, कृष्ण, दुर्योधन आणि युधिष्टिरला भेटायला बोलावतात … 
त्रिशू- दुर्योधन, युधिष्टिर कोण? 
मी- ते दोघे कझिन्स असतात. 
त्रिशू- अच्छा! मग आतु?
मी- मग, कृष्ण दुर्योधनला सांगतात, तू मला एक चांगला माणूस आणून दे! आणि युधिष्टिरला सांगतात, तू मला एक वाईट माणूस आणून दे! मग, थोड्यावेळाने दुर्योधन येतो आणि सांगतो मला काही कोणी चांगला माणूस भेटला नाही,आणि तो निघून जातो. मग, युधिष्टिर येतो, तो म्हणतो, मला कोणीच वाईट दिसलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण जशे बघू तशेच लोकं आपल्याला दिसतात. आपलं मन चांगल असलं की आपल्याला सगळ छानच दिसत. 
त्रिशू- हो, म्हणजे आपण छान आहोत म्हणून सगळे आपल्याला छान दिसतात हो ना आतु?
मी- हो बरोबर! म्हणजे आता तुला काय कळाल रंगापेक्षा काय महत्वाचं असत ?
त्रिशू- बुद्धी, मन आणि गुड हबिटस! बरोबर आतु?
मी- हो…म्हणून जे वर्णभेद करत आहे त्यालापण आपण समजवायचं की असं करू नको, नाहीतर मला सांग मीच येऊन बघते त्या तुझ्या मित्राला… 
त्रिशू- खरचं आतु… अरे वाह, पण, वर्णभेद म्हणजे काय आतु?
सांगा याला काय म्हणू? ज्या बछड्याला वर्णभेदाचा अर्थ कळत नाही त्यान ते अनुभवलं सुद्धा… 

प्रिया सातपुते 


Friday 18 July 2014

प्रियांश...४२


आज माझी सकाळ खूपच उशीरा झाली, डोक्यावरचं ओझं जेव्हा हलक होत तेव्हा, खूप छान झोपं लागते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मग, काय कॉफीच्या मगासोबत, काळ्याकुट्ट ढगांची साथ मिळाली…कॉफीच्या वाफा अन पावसाच्या धारा…खूप सही वाटत… एकटक त्या कोसळणाऱ्या पावसाकडे पाहून, मन अगदी रीत होऊन जात…काहीच उरत नाही…मन अगदी तल्लीन होऊन जात…पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आवाज कानाशी येउन एक वेगळाच राग गात असतो…पावसाची एखादी झुळूक मग हलकेच येऊन स्पर्शून, या देहाला जिवंत असल्याची जाणीव करून देते…पावसालाच चावटपणा सुचत असावा म्हणून तो हळूच, एक दोन थेंबाना माझ्या गालापर्यंत पोहचवून देतोच…त्या धांदरटाला मला जाग करण्याची इतकी का घाई झाली होती…त्या सुंदर, रोमांटिक पावसाला श्वासात भरून घेऊन, मी माझा मुक्काम गैलरीमधून हलवला…

प्रिया सातपुते 

Tuesday 15 July 2014

प्रियांश...४१

कालच मी आणि माझा एक मित्र (उच्चवर्णीय बर का…नाही तर काहींना मी पुन्हा उच्चवर्णीय द्वेषी वाटेन, म्हणून स्पष्टीकरण देतेय) वॉटसअप वर गप्पा मारत होतो,…त्याचा हळदीचा डीपी पाहून मी त्याला अभिनंदन केलं, तर कळाल की तो तर ताईच्या लग्नातला फोटो आहे…मग,  काय एकमेकांच्या लग्नाची इन्क्वायरी सुरु झाली… मी पण मग विचारून टाकलं कधी लग्न करतोयस? अर्थात त्याची गर्लफ्रेंड आहे…तर तो चक्कं नाही म्हणाला… का? वर त्याचं समर्पक उत्तर ऐकून मीही अवाक झाले… इथे एक महत्वाची बाब सांगायची राहिली ती मुलगी सुद्धा उच्चवर्णीयच आहे, पण, जात वेगळी…अडलं घोड इथे…उच्च असो वा काहीही…इथेही जातीने घाला घातलाच! मी त्याला विचारलं होत, "असं कसं जमत रे तुम्हांला? प्रेम एकावर अन लग्न दुसरयासोबत?" त्याचं उत्तर अत्यंत समर्पक होत, "दोघेही भित्रे असतील तर जमत सहज, घरच्यांचा विचार केला कि जमत, सिस्टीमचा विचार आला कि जमत आणि सर्वात महत्वाच म्हणजे जगायचं आहे म्हंटल की हे जमतच जमत!" 

काहींना हे उत्तर भित्र वाटेल पण, त्यातला गाभा खूप महत्वाचा आहे, माणूस उच्च जातीतला असो वा काहीही…इथे ना प्रेमाला थारा आहे ना जगण्याला…म्हणून तर निडर होऊन जे पळून जाऊन लग्न करतात त्यांच्या वाट्याला भयानक मृत्यू येतो…यालाच तर आपण "ऑनर किलिंग" म्हणतो…प्रेम ही किती सुंदर भावना आहे, दोन निष्पाप जीवांची एकमेकांवरची माया, तिथे ना धर्म महत्वाचा असतो ना जात, तिथे फक्त मानल्या जातात भावना, पण…इथे ही आडवी येते ती जात… अधून मधून रोज वाचायला मिळत प्रेमी युगुलांना राखी बांधायला लावली, विवाहित जोडप्यांना सुद्धा भाऊ बहिण करून टाकल, तर काहीची प्रेते लटकवली, तर काही कधीच दिसले नाहीत, दगडांनी ठेचून मारलं… किती भयानक आहे हे… 

प्रेम करणही गुन्हा होऊन बसल आहे तर…याच्यावर एकच उपाय आहे, आपण सर्वांनी ना गळ्यात एक पाटी अडकवून फिरायला हवं, धर्म अमुक, जात तमुक, घरी आंतरजातीय विवाह चालेल वा नाही, *Conditions Apply,…म्हणजे प्रेम करताना सेम जातीतला भेटायला सोप्पं होईल आणि हो तिथे फायानंशियाल कंडीशन पण टाकायला विसरू नका हं…

प्रिया सातपुते


Monday 14 July 2014

प्रियांश...40

जात ही माणसाच्या मनात, रक्तात इतकी बिंबवली गेली आहे की काय सांगु, ती सावली सारखी सगळीकड़े पिच्छा पुरवते. एक घड्लेलच उदाहरण देते...

एका मैत्रिणीने ऑनलाइन वधुवर मंडलात नाव नोंदवल होत...दिसायला देखनी, कर्तबगार, पाच अंकी पगार...तिला एका समजातीय मुलाने लग्नासंधार्बत फोन केला, दोघेही बोलले, त्या मुलाचे वडिल तिच्याच जातीचे होते पण, आई उच्चवर्णीय जातितली होती, तिला अप्रूप वाटल, ही गोष्ट तिने मला लगेच सांगितली, मी तिला सावध केल पण, तिला ते रुचल नाही. दुसरया दिवशी त्या मुलाने तिला फोन केला नाही फ़क्त मेसेज करून नकार पाठवला. ऑफिस सुटताच तिने त्याला फोन लावला कारण, दोघांच बोलन आधीच झाल होत, त्याला ती पसंत होती, मग घडल तरी काय? तिला उत्तर हव होत, तो फोन उचलत नव्हता, शेवटी तिने त्याला मेसेज करून विचारल, काहीच उत्तर आल नाही. घरी पोहचून तिने पुन्हा एकदा फोन केला, त्याने तिला उत्तर दिल, त्याचा आवाज दबला होता, तो म्हणाला माझ्या आईला आंतरजातीय लग्न चालेल पण, खालची जात नको आहे, सॉरी बोलून त्याने फोन कट केला. ती एखाद्या मृत बाहुली सारखी उभी होती...

मनाच्या चिंधड्या, तिच्या गालावरून ओघळत होत्या, ती फ़क्त विचारत राहीली, "कधी संपणार हे प्रिया, किती चटके सोसायचे या जातीचे?" मी चेहरयावर एक कुस्हीत हास्य आणून म्हंटल होत, "आपल्या शेवटच्या श्वासाबरोबर..."

प्रिया सातपुते

Wednesday 2 July 2014

ये रे, ये रे पावसा रुसलास का?



ये रे, ये रे पावसा रुसलास का?
माझ्याशी गट्टी फू केलीस का...
सांग ना रे मित्रा,
असा कसा रुसलास?
फुरगटून लपलास...


ये रे, ये रे पावसा रुसलास का?
कुठे शोधु तुला?
आता तरी ये ना
काय करू आता?
कान पकड़ते मी.. 


ये रे, ये रे पावसा रुसलास का?
कधीची उभी आहे मी
बघ ना जरा मला
मैत्रीच्या पावसात 
चिंब भिजू दे मला...


प्रिया सातपुते

Tuesday 1 July 2014

प्रियांश...३९

एखाद्यावर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा, तो किंवा ती जे काही म्हणेल तेचं आपण करतो…त्याला दुखावू नये म्हणून आपण त्याच्या प्रत्येक हो मध्ये होच म्हणतो…काळ सरतो अन मग जाणीव होते आपण स्वतःहूनच स्वतःभोवती एक जिवंत साप गुंडाळून घेतला आहे…त्याच्यापासून वाचायचं कसं? मग त्याच्यासोबतच डुलू लागतो अन मग तोच सर्वकाही वाटू लागतो…मग, एके दिवशी हाच साप कधी गळ्याचा चावा घेऊन दुर निघून जातो हे कळत देखील नाही…अश्या या सापाला आपल्याच मानगुटीवर पोसायचाच कशाला? प्रत्येक माणूस हा एक जीव आहे, त्याचं स्वतःच एक वेगळ अस्तित्व आहे…आणि जेव्ह्या या अस्तित्वावर घाला बसतो तेव्हा माणूस आयुष्यातून उठतो…कारण, प्रेमापोटी आंधळे बनून, तुम्ही स्वतःच स्वः विसरून जाता अन स्वतःवर प्रेम करण देखील…

प्रिया सातपुते