Friday 16 September 2016

प्रियांश...८४

उसवलेल्या नात्याला शिवत बसण्यापेक्षा त्याला तिथेच झटकून आयुष्यात पुढे निघून जाणं कधीही शहाणपणाचं ठरेल!

आयुष्यात तुम्ही एखाद्याची सावली बनता, त्याच्या किंवा तिच्या पडत्या नडत्या काळात साथ बनता! त्यांच्या सोबत ठाम उभे राहता! जिथे तुम्ही स्वतःला मोकळं करू शकता तिथं तुम्ही जळू सारखे चिटकून राहता ते स्वतःच रक्त, प्रेम, वेळ देत! कालांतराने चक्र फिरतात अन हीच व्यक्ती त्यांच्या सुखद काळात मात्र तुम्हांला सोडून देते अर्थात डीच करते, ते सुद्धा एका क्षणात! विचार सुद्धा शिवत नाही अश्या लोकांच्या मनात की आपल्या वाईट दिवसात ही व्यक्ती माझ्यासोबत लढली, माझ्यासोबत ठाम राहिली, मला नेहमी पाठबळ देत राहिली,....शून्य आठवण!

अश्या माणसांना इतकं महत्व द्यायचंच कशाला की ते तुमच्या आयुष्यात डोकावतील, पुन्हा यायला पाहतील, त्यांना माफ करा पण, हे लक्षात ठेवा, एकदा सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला पुन्हा सोडू शकते! स्वतःला दुजाभाव न देता स्वतः वर प्रेम करा, स्वतःच्या आयुष्याचा राजा राणी बना, तुमचा लाईफ पार्टनर तुम्हाला शोधत नक्कीच तुमच्या हृदयाचं दार ठोठावेल!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment