Thursday 30 October 2014

प्रियांश...५५

आपण नीट जगलो की नाही याची पोचपावती आपल्या निष्प्राण देहाला चितेवर ठेवण्याआधी, कितीजण प्रेमाने हात फिरवतात? कितीजण कवटाळुन रडतात? आगीच्या डोहात जळणाऱ्या देहाला पाहून कितीजण धाय मोकलुन हमबरडा फोडतात? कितीजनांचे डोळे पाणावतात? आपल्या शरीराची राख गोळा करताना कितीजण आठवनीनी गदगदून जातात? पिंडदानावेळी किती नैवेद्य हजेरी लावणार? १२ दिवस किती चुली फक्त आपल्यासाठी जळतात? तोंड गोड करण्यासाठी किती मिठाया न मागवता घरी पोहचतात! दुरदेशीचे नातलग किती दिवसात धावत येतात? किती आठवणीने फोन करतात? यातच साऱ्या आयुष्याचा लेखा जोखा आला!

हे सार जर का घडेल तर आपण खुप सुंदर जगलो, जन्माला येताना आपण सारे रडत येतो पण, शेवटच्या श्वासासोबत जाताना मात्र आपण राजा/राणी बनून जायच! पण, संपूर्ण रस्त्यात प्रेमाच्या अश्रुंची झालर पसरलेली असली पाहिजे! तरच आयुष्य जगल्याची पोचपावती मिळेल नाही का?

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment