Tuesday 30 July 2013

हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय…



हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय 
पावसाला सोबत घेऊन नाचावस वाटतंय 
प्रत्येक सरीवर पिसारा फुलवून 
मोरासंगे peacock डान्स करावसा वाटतोय 
हल्ली मला प्रेमात पडावस वाटतंय… 
तळ्याकाठी बसून 
टिक टिक वाजते गावस वाटतंय
पाण्याच्या शहरयांवर 
धड धड वाजते आहे का ते ऐकावस वाटतंय 
हल्ली काय आहे ना…. 
मला प्रेमात पडावस वाटतंय… 

प्रिया सातपुते

Wednesday 24 July 2013

अपेक्षा



अपेक्षांचं ओझं 

असतं तरी कसं ?

मीठाच्या पोत्यासारख 

विरघळून जाणार,

कि कापसाच्या पोत्यासारख

भिजून आणखीनच जड होणार ?

प्रिया सातपुते

Tuesday 23 July 2013

ऋण गुरुचे


आपण जन्माला जरी एकटे येतो तरी आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण वेगवेगळी नाती गुंफतो. मग त्या नात्यात आपले आई बाबा, बहिण, भाऊ, काका, काकी, मामा, मामी, शेजारी, मित्र अशी अनेक नाती येतात. या प्रवासात आपण कधीतरी ठेच खातो, पडतो, धडपडतो, या वेळी आपल्याला उचलायला येणारे हात, कधी आपल्याला जगायला शिकवून जातात तर कधी कसं जगायचं? त्यांचे आपण कायमचे ऋणी होऊन जातो. त्यांनाच आपण "गुरु" म्हणतो.

लहान मुलं मातीचा गोळा असतं, त्याला हवा तो आकार द्या ते तसं रूप घेत, त्याला पहिला आकार देते ती त्याची "आई", प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला गुरु ही त्याची आईचं असते. आई, आपल्याला बोलायला, चालायला, बागडायला शिकवते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्याला प्रेम करायला शिकवते, "निरपेक्ष प्रेम". संस्कारांचं बाळकडू तिच देते. चिमुकल्या पंखात उडण्याच बळ देते. कालांतराने क्रम लागतो बाबांचा, त्यांच्यातला कणखरपणा आणि तत्वं देण्याचा ते आतोनात प्रयत्न करतात. अशा माझ्या आई-बाबांना एकचं सांगावस वाटतंय, "Love you Mumma-Papa".

मग, येते ती शाळा, माझी शाळा!!

काळ्या फळ्यावर जसा खडू अक्षरे उमटवायचा तशीच काही गत आमची पण असायची, काही गोष्टी मनाच्या फळ्यावर छाप सोडून जायच्या तर काही एका कानातून आत आणि दुसरया कानातून बाहेर.
आयुष्याचा पहिला अध्याय, इथेच लिहला गेला. आईच्या मायेनी डोक्यावर हात ठेऊन, वेळ पडली तर कान ओढणाऱ्या बाईंच्या आसपास घुटमळतो आजही जीव!! या शाळेत मिळाले अगणित "गुरु", ज्यांनी आमच्या भविष्यासाठी अतोनात जीव ओतला. "गुरुपौर्णिमा" अजूनही आठवते, दिक्षीत गुरुजी आणि तोफखाने गुरुजींच्या फोटोंना गुलाब ठेवताना तेव्हा जास्ती काही जाणवत होत कि नाही हे माहित नाही, पण आज ते दिवस आठवून डोळे मात्र पाणवतात हे नक्की.

पंखाना बळ घेऊन आपण उंच भराऱ्या मारू लागतो, कळत नकळत कुठे तरी ठेच लागून पडतो, तेव्हा मात्र जितकं काही आपण शिकलो आहे, ते सगळ विसरून जातो आणि एका अंधारात गुरफटून जातो. आपणास, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याकरता जी व्यक्ती पुढे येते, आपल्या निरपेक्ष प्रेमाच्या चादरीत आधार देऊन, आपणास पुन्हा उडण्याच बळ देते, त्यांच्या प्रत्येक शब्दांत जादू असते, आपण पुन्हा उंच भराऱ्या घेऊन उडू जरी लागलो तरी आपणास जपण्यास ते नेहमीच तत्पर असतात. अश्या माझ्या "जादूगार गुरुंना " माझा शत शत प्रणाम!! अशे गुरु तुम्हा सर्वाना लाभोत हीच गुरुंपुढे प्रार्थना!!

मी माझ्या सर्व प्रिय गुरुंना, धन्यवाद देऊ इच्छिते कि त्यांनी मला इतक सुंदर घडवलं आहे कि मी स्वतःला आरशात पाहते तेव्हा आपसूकच मला माझ्या डोळ्यात मी त्यांनाच पाहते, माझातल्या प्रत्येक गोष्टीत कुठेतरी माझी आई, बाबा, माझे जादुगार अर्थात गुरुजी आणि निखील भैय्या, भागवत मैडम, घोरपडे मैडम, संध्या मैडम, कुंभार सर, जाधव सर,…. यांची छवि मला जाणवते.

Love you all, thank you so much for inspiring me and creating me!!

प्रिया सातपुते








चारोळी



पहिल्याच पानावरच

माझं पहिलं नाव,

वाच ना ?

प्रिया बरोबर ना?


प्रिया सातपुते

चारोळी

वहीतून हे पान फाडताना,
झाला मला खूप त्रास,
माफ कर प्रिय वही,
कान पकडते थांब. 

प्रिया सातपुते 

Sunday 7 July 2013

खरचं, तुला आई व्हायचय का?



हल्ली आई होण्याच फॅड आलं आहे, म्हणजे कशी आई, सुटसुटीत आई, गरोदरपणाचे नऊ महिन्याचे त्रास न घेता डायरेक्ट बाळ हातात. कल्पना सुंदर आहे, हे म्हणजे कसं झालं, अभ्यास ना करता पहिला येण, काहीही न करता करोडो रुपयांचा मालक होण. एकंदरीत झाडाला मुले लटकली आहेत आणि आपण जाऊन फक्त आपल्याला जे फळ अर्थात मुलं आवडेल ते तोडून घेऊन जायचं. 

वाचूनच किती सुंदर वाटत असेल ना? नाही? का नाही पण? 

आपल्या समाजानेच तर हा नियम सुरु केला आहे. एखाद्या जोडप्याला मुल होत नसेल तर त्याने दुसर लग्न कराव, मग तिथेही काम झाल नाही तर, पुन्हा तिसर,… आता सध्या हे प्रमाण कमी झालं असेल पण, अजूनही अश्या गोष्टी घडतच असतात. स्त्रीच्या मनावर बिंबवलं जात कि "एक स्त्री आई बनल्याशिवाय पूर्णत्व अनुभवत नाही", असं बोलून संपूर्ण स्त्री जातीचा अपमानच करत आहेत हे लोक. ज्या निसर्गाने आपल्याला घडवलं, ज्या आईने आपल्या जन्माला घातलं, आणि ज्या देहाच्या जोरावर आपण या जगात वावरतो तो अपूर्ण असेलचं कसा? प्रत्येकाच्या कर्माने, त्याच्या लेख्या जोख्याने, जे आहे ते मान्य करून आपण आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरांचा मान ठेवला पाहिजे. निसर्गाचा मान ठेवला पाहिजे. 

पण, दुर्दैवाने असं होताना दिसत नाही, मुलं न होण हे सर्वस्वी स्त्रिच्या माथी मरकटल जात. ज्या भारत देशात स्त्रिला पूजनीय समजल जात, तिथेच तिला वांझोटी म्हणून हिणवलं जात. मानसिक आणि शारीरिक त्रासातून तिची सुटका फक्त एकतर मृत्यू किंवा मुलंच करू शकते. 

सायन्स कितीही पुढे गेलं असेल तरी सुद्धा ते मनाचे घाव भरण्याच औषध शोधू शकत नाही. मुलं होण्यासाठी बरेच नवीन उपचार उपलब्ध झाले जरी असले तरी त्यातले दुष्परिणाम मात्र नजरेआडच जातात. यात मग, गर्भाशय भाड्याने देण, शुक्राणू विकत घेण, मानसिक ताण, कायद्याच्या बाबीही आल्याच. हे सार आपण कशासाठी करतो, एका तान्हुल्या बाळासाठी. मग, इतक्या साऱ्या अनाथ आश्रमात आई बाबांची वाट पाहणाऱ्या या चिमुकल्यांना का नाही जवळ केल जात? का ? तर ते आमच रक्त नाही, कुठल्या जाती धर्माचं आहे कोण जाणे? लोक काय म्हणतील? अशे एक नाही हजारो प्रश्न शिकलेल्या या मंदबुद्धी माणसांना पडतात आणि ते पुन्हा त्याच चक्रव्युहात अडकतात…"मला आई व्हायचंय?"

जराशे डोळे उघडून पहा तर आजूबाजूला असणारया "सिंधुताई सपकाळ" अर्थात "माई" तुम्हाला दिसतील, आणि तेव्हा अश्या या माणसांना फक्त एकच प्रश्न विचारण्याची सुप्त इच्छा होते, "खरचं, तुला आई व्हायचय का?"

प्रिया सातपुते 



















Friday 5 July 2013

आत्महत्या!!


का कोणास ठाऊक आज मला या विषयावर थोडंस लिहावसं वाटलं. काही दिवसांपूर्वी जिया खानच्या आत्महत्येमुळे बराच गोंधळ झाला, जिवंत असताना कोणालाही तिची इतकी क्रेझ नव्हती पण तिच्या अश्या मृत्यूमुळे सर्वानीच हळहळ व्यक्त केली. मृत्यू इतका सोप्पा झाला आहे कि त्याची भीती कोणालाच उरली नाही कि काय? हा प्रश्न मनात उमटतो हे मात्र नक्की. 

हिंदू धर्माप्रमाणे जे कोणी आत्महत्या करतो किंवा करते त्यांना कधीच मोक्षं मिळत नाही, ते हजारो वर्ष अडकून पडतात. आत्मा ही एक चिरंतन चेतना अर्थात एनर्जी आहे, जी कधीच मरत नाही ती फक्त आपले रूप अर्थात कपडे बदलते, म्हणजेच आपला देह हा एक प्रकारचा आउटफिटच आहे. आपल्या चेतनेला संपवणे हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याला प्रत्येक धर्मात पापच मानलं जात. 

आजकाल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर यंगस्टर्स आपल्या जीवच बर वाईट करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त चालू असते ती स्पर्धा जिंकण्यासाठी आणि जर त्यात हार मिळाली तर ती त्यांना पचत नाही मग ती प्रेमात असो वा अभ्यासात वा घरातल्या हलक्या फुलक्या भांडणात. 

माझी लहानपणीची मैत्रीण, नेहमी पहिला नंबर असणारी, पण पाचवीत तिला बोर्डिंगला घालण्यात आलं, पण पुन्हा तिला गमेना म्हणून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला कारण आमच्या शाळेत प्रवेश बंद झाले होते. कालांतराने आमचे मार्ग वेगळे झाले आणि एके दिवशी वर्तमानपत्रात तिचा फोटो आला होता, तिने आत्महत्या केली होती. दहावीत बोर्डात, बारावीला पण बोर्डात आणि तिची आत्महत्याची बातमी वाचून माझं डोक चक्रावूनच गेलं होत. आम्हाला कारण समजलं नाही. फक्त एवढचं कळाल कि ती जेवून, तिच्या लहान भावासोबत बोलून, आपल्या रुममध्ये गेली, थोड्या वेळात तिचे बाबा रूम मध्ये पाहतात तर तिने पंख्याला दोर लाऊन आत्महत्या केली होती. असं काय घडलं कि तिने जीव दिला हे अजूनही गूढच आहे पण, आपला जीव इतका स्वस्त झाला का? कि तो इतक्या सहजासहजी संपवून टाकायचा? 

आयुष्यात अडचणी कोणाला चुकल्या आहेत? त्या तर सर्वांच्याच पाचवीला पुजलेल्या असतात पण, म्हणून आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. त्रासाला कंटाळून लग्न झालेल्या बायका जीव देतात, पाठीमागे आपल्या मुलाबाळांच काय होईल? याची जर सुद्धा चिंता नसावी? कि मदत मागायला लाज वाटते म्हणून जीव देण हा मार्ग नक्कीच असू शकत नाही. कारणे काहीही असोत आत्महत्या हा उपाय नाही. आपल्या जवळच्या मित्र-परिवारात जर कोणी सुसायडल सिम्पटमस दाखवत असेल तर त्यांना मदत करा, आयुष्य खूप सुंदर आहे हे पटवून द्या. 

माझ्या जादुगाराने म्हंटले आहे कि, आयुष्यं हे हायवे सारखं असतं, जिथे आपणास एक्झिट दिसतात, हे आपल्या हातात असत कि कोणती एक्झिट घ्यायची अथवा नाही!!

Life is short and precious, live it like there's no tomorrow!!

प्रिया सातपुते