Friday 21 December 2012

मी सुरक्षित आहे???



आज मला समजत नाही आहे, कि एक स्त्री म्हणून मी या देशात किती सुरक्षित आहे??
आई-बाबांच्या पंखांत लहानाची मोठी झाले, थोडस जग पाहण्याच्या लालसेपोटी मी घराबाहेर पडले, ज्या जगाला मी सुंदर समजलं, ते खरच खूप सुंदर होत...कि माझा भ्रम होता हेच मला कळत नाही. 

रोज वर्तमानपत्रात येत, स्त्रियांवरचे अत्याचार...त्याच विश्लेषण होत, प्रत्येक ठिकाणी एकचं  चर्चा असते...घरगुती अत्याचार, बलात्कार, लैंगिक छळ, अश्या बातम्यांनी पूर्ण वर्तमानपत्र खचाखच भरून गेलेलं असत.

स्त्री हि निसर्गाची सर्वात अप्रतिम निर्मिती आहे. ती कधी आई बनून मायेची पाखर घालते, तर पत्नी बनून आयुष्याच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ करते, बहिण बनून खोड्या काढते, आणि छोटीशी गुलाबाची कळी बनून संसाराची वेल बहरून आणते. पण, माणसांमधली वैश्यभावना इतक्या खालच्या पातळीला पोहचली आहे कि ते या कळ्यांनापण कुसकुरुन टाकत आहेत. हे आधीपासून होत आल आहे, फरक हा आहे कि आता मिडिया या सगळ्या बाबींना प्रकाशझोतात आणत आहे. पण, फक्त हेच करून काही होणार आहे का??

या सगळ्या गोष्टीना आळा बसलाच पाहिजे, या निर्घुण माणसांना जगण्याचा काहीच अधिकार नाही.
ती फक्त २३ वर्षाची होती, आणि तिच्यावर हल्ला करून बलात्कार केला गेला, हा शब्द इथे लिहितानाच मला इतका त्रास होत आहे, तिच्यावर ते बेतल, तेही महान भारत देशात, जिथे मोठ मोठ्या पार्टी भारताच्या संस्कृतीचा टेंभा मिरवत आहेत. आता ती कधी सामान्य आयुष्य जगु  शकेल? बलात्कार हा शरीराचा जितका होतो तितकाच मनाचा, तिच मन कधी सावरेल? पण, ज्यांनी हे कृत्य केल, त्यांना तर मस्त काळा मुकुट घालून पोलिसांनी आणलं, अश्या नराधमांना इतक्या मानाने कस मिरवलं  जाऊ शकत? सोडून द्या त्यांचे काळे मुकुट आणि सोडा ती आंधळी तराजू पकडणारी मूर्ती, जनताच करू दे निवाडा.
हि २३ची होती, एक ३ वर्षाची, ज्या कळीला अजून जग काय आहे हेच माहित नाही त्यांना सुद्धा हे नराधम सोडत नाहीत मग कायदा काय कामाचा? फक्त फाशी देऊन काही होत नाही, यांना तर शिवकालीन शिक्षा द्यायला हव्यात,...आणि त्याचं थेट प्रेक्षपण व्हाव, जेणेकरून आयुष्यात कधीच अशी हिम्मत होणार नाही कोणाचीच.

प्रिया सातपुते 

Thursday 20 December 2012

या मनाला कराव तरी काय?






एकेकदा वाटत हे मन किती अजब आहे, कितीकाही सामावलं  आहे यात, आज आता या क्षणाला ते सुखी असतं  आणि पुढच्या काही क्षणात ते हतबल असत...

या मनाला कराव तरी काय?
शांत रहाव तर ते समुद्रात धाव घेत,
समुद्राजवळ उभं राहा तर ते आकाशात झेपावत,
आकाशात जाव तर ते इकडे तिकडे भटकत राहत.

या मनाला कराव तरी काय?
कधी काय टोचेल अन टपकन अश्रू ओघळेल,
तर कधी कड्यावरून पडून पण स्मितहास्य करेल,
बंदिस्त शरीरातून बाहेर येण्याची केविलावणी धडपड नेहमीच करेल,
आणि चितेवर जळणाऱ्या देहाला पाहून टाहो फोडेल.

या मनाला कराव तरी काय?
काय दडलंय यात,
कधी काळ्या तर कधी पांढऱ्या रंगात लपून राहत,
तर कधी लाल रंगाने नाहून निघत,
हळूच चोर पावलांनी आकाशात क्षिताजापर जात,
आणि रंगीबेरंगी इंद्रधनूसारखं साऱ्यांना सुखावत.

या मनाला कराव तरी काय?
माराव ?
ओरडाव?
लाथाडाव?
कि कुरवाळाव??


प्रिया सातपुते....



Thursday 6 December 2012

आई



आई फक्त तुझ्यासाठी......

आताच मी फेसबूकवर एक छानशी "आई" नावाची कविता वाचली आणि विस्मृतीच्या आड लपलेली काही पाने नकळत फुंकर देऊन उघडी झाली. 
मी पहिली मध्ये असेन माझी आई मला तिच्या आईजवळ ठेऊन बाबांना मदत करायला जायची, अर्थात त्यावेळी एकंदरीत परिस्थिती इतकी सोप्पी नव्हती, पण, लहान असल्यामुळे मी या आई नावाच्या पात्राला  कधी समजूच शकले नाही. तशी ती वेळीही  नव्हती समजून घेण्याची. पण, शाळेतल्या एका कवितेतल्या आईसारखी माझी आई कधीच शाळा सुटल्यावर यायची नाही, ना दारात उभी राहून वाट पहायची की घरी  गेल्या मला कुशीत घेईल. त्यावेळी मी आईचा खूप मार देखील खाल्ला...पण, एक फुलपाखरू जसं  बोटांवर त्याच्या मऊ  स्पर्शाचे रंग ठेऊन उडून जात, अगदी तसं मला देखील कळून चुकल होत कि आई तर हे सार माझ्याकरताच करत आहे. 
शाळेत निबंध लिहायचा होता, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"....हा निबंध लिहताना आपसूकच माझं  मन मी त्यात ओतल होत म्हणूनच तो निबंध अजूनही माझ्या स्मरणात आहे. माझ्या आईला मी जाणलं होत म्हणूनच त्या निबंधाला खूप वाहवाही पण भेटली.

आई हा शब्दच जादूमय आहे, "आ" म्हणजे "आत्मा" आणि "ई" म्हणजे "ईश्वर", यांच्या संयोगातूनच आई बनते. आई खरीखुरी जादुगारच असते, नऊ महिने ती आपल्याला उदरात जपते, आणि हीच जगातली सगळ्यात मोठी जादू आहे...ती एका पिटुकल्या जीवाला बोलायला, चालायला शिकवते. ती तिच्या संस्कारांच्या शिकवणीतून शिवबा ला छत्रपती बनवते तर कधी आपल्या दुबळ्या बाळाला जगण्याच बळ देते. 
या आईच्या प्रेमाखातर देव-देवी सुद्धा मनुष्य रूपाने जन्मास आल्याच्या पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतच आलोय. 
आई बद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे, म्हणूनच बोलतात, "आईवर निबंध लिहायला समुद्राची शाई  आणि आकाशाचा कागद सुद्धा अपुरा पडेल."

अजूनही मी आईच पूर्ण मन कधीच समजू शकणार नाही, पण, मी रोज प्रयत्न करतेय तिला समजून घेण्याचा. आई मला ऐकवत असतेच की "तुला नाही कळणार आता, आई हो एकदा मग कळेल आई म्हणजे काय असते." सो ट्रू !! 

प्रिया सापुते 

Monday 29 October 2012

Onion पोहे


पोहे म्हटलं कि कसं तोंडाला पाणी सुटत...गरम गरम पोहे आणि चहा....
अरेच्या कांदे पोहे, आधीच्या काळात रीतच होती, मुलगी पाहायला आले कि पाहुण्यांना कांदे पोहे दिलेच पाहिजेत. मग तो पोह्यांचा ट्रे, मुलगी घेऊन येईल...सगळ्यांना देईल, मुलाकडे देताना लाजून चूरर होईलं, आणि मधोमध बसून, मान खाली घालून सगळ्यांच्या प्रश्नांना सामोरी जाईल, गाणी गाऊन दाखवावी लागतील, चालून दाखवाव लागेल,....हे सार कशासाठी? मुलगी कशी गाते? आवाज कसा आहे? नीट चालते का? आणि बरंच काही तपासलं  जायचं.

पण, आता कांद्याचे Onion पोहे झाले आहेत....ते कसं काय? विचारात पडलात?? 
अनघा, आताच्या काळातली स्वतःच्या पायावर उभी असलेली एक सामान्य युवती. इंजिनियर बनून, चांगल्या कंपनीत नोकरीला होती. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनघाच्या घरातल्यांना तिच्या लग्नाचा घोर लागला होता...अनघा ऑफिस संपून बराच वेळ निघून गेला होता पण ती घरी जाण्याच्या मूड मध्ये दिसत नव्हती. आज तसं तिला तिच्या ग्रुपला भेटायला जायचं होत, सारखे फोन येत होते पण, ती उचलतच नव्हती, शेवटी वैतागून तिने उचलला, सगळ्यांचा ओरडा सुरु झाला होता तसं ती नाईलाजास्तव उठली....ग्रुप मध्ये तसं कोणाच लग्न नव्हत झाल...सारे बेचलरस...सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या...अचानक तिने गोप्यस्फोट केला कि ती प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जातेय...सगळ्यांचा जोरात ओरडा सुरु झाला...सगळे एकदम धमाल मूड मध्ये होते.
अचानक, थोड्यावेळाने तिने ग्लास फोडला, आणि ती जोरजोरात रडू लागली....कोणालाच समजेना काय झाल अचानक?
डोळे पुसून अनघाने मोठ्ठा श्वास घेतला आणि ती बोलू लागली....
" मी अनघा, वय २५, एका मोठ्या कंपनीत काम करतेय, दिसायला सुंदर, रंग गोरा, उंची ५ फूट ६ इंच, कोणतच व्यसन नाही, ना काही अफेयरस, जेवण सुद्धा छान बनवते, पगार सुद्धा छान आहे, मोठ्यांचा आदर, लहानांना प्रेम करणं हेच मला लहानपनापासून शिकवलं आहे, आणि मी तशीच आहे, ना मी कोणाला कधी दुखावलं ना मारलं....माझी चूक आहे तरी काय?? कि मी एक मुलगी आहे? खेळण आहे का मी सगळ्यांच्या हातातलं...?? इतकी शिकून सावरून, माझ लग्न होत नाहीय? का? मी हुंडा देणार नाही म्हणाले म्हणून...माझ्या आईच मी पण एकुलत एक पाखरू आहे, मला पण भावना आहेत, मला नाही घ्यायचा विकत नवरा. तिला बरचं काही बोलायचं होत पण, ती अचानक गप्प झाली."

अशा अनेक अनघा आपल्या आजूबाजूला आहेत. काही, सहन करत आहेत तर काही....

अनघा नंतर भेटूया मोनिकाला, आधुनिक विचारांची तरुणी, आई वडील सुद्धा तितकेच आधुनिक आहेत, इंटरनेट या नव्या मार्गाने त्याचं वर संशोधन सुरु आहे. प्रत्येक पोर्टलवर तिचा प्रोफाईल अपलोड आहे. अधून मधून तिच डेटिंग पण चालूच असत...आणि त्यात काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही. पण, रोज नवीन मुलांसोबत बोलून तिचं मानसिक संतुलन बिघडलं होत. अपेक्षा आणि वास्तव यातला फरक तिला करता येईना. याच रुपांतर चिडचिड करने, रात्री मध्यरात्री मद्यधुंद होऊन मित्र-मैत्रिणीच्या घरी थांबण,...नकार पचला नाही कि पबला जाण...योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची तिची क्षमता कुठेतरी हरवून गेली होती.

योग्य आणि अयोग्य यामध्ये जास्ती फरक असतोच कुठे? तो तर आपणच ठरवतो, प्रत्येक जण आपापले ठरवतात काय योग्य आणि काय अयोग्य.

आजकाल मी पण ठरवतेय कि मी कोणता मार्ग घेऊ?
मनामध्ये कधी कधी विचार येतात आणि ते पंख लाऊन उडून देखील जातात पण, मी त्यांच्या मागे धावत नाही, कारण ते पुन्हा माझ्याच ओंजळीत येऊन विसावणार हे मला माहित असत, म्हणून मी ठरवलंय, मी मध्य साधणार दोन काळांचा मध्य आणि तो आहे Onion पोहे.

बघा विचार करा मित्रहो, तुम्हाला कोणते पोहे खायचे आहेत? आणि बनवणाऱ्या माझ्या मैत्रिणीना, कोणते पोहे बनवणार आहात तुम्ही?

तुमची प्रिया सातपुते.


Wednesday 24 October 2012

!! दसरा !!



आज आपण दसरा साजरा करत आहोत, आजच्या या दिवशी आपण रावणाला जाळतो, अन्यायाचा नायनाट व्हावा म्हणून देवीला साकड घालतो...सगळी कडे भारत देशात हे नऊ दिवस प्रचंड जल्लोष असतो, दांडिया, गरबा, देवी पूजा, काली माता पूजा, दुर्गा पूजा, अश्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. ज्या स्त्रीरूपी देवीची आपण पूजा करतो, जिला आपण साकड घालतो, सुखी ठेव, पैसा दे, मुलगा दे, आणि मुलगी नको???

एका स्त्रीशक्ती कडेच आपण मुलगी नको म्हणतो....का??? ही मानसिकता आहे कि दुसर काही याचं विश्लेषण मला इथे करायचं नाही, आजपर्यंत बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांचं आयुष्य बदलवण्यात हातभार लावले आहेत. पण, एक स्त्री म्हणून मी किंवा स्वतः तुम्ही किती हातभार लावलेत? किंवा एक पुरुष म्हणून तुम्ही एका स्त्रीला किती रूपांमध्ये पूजनीय ठरवता आणि मानता? एक मुलगा म्हणून? एक पती म्हणून? आणि एक पिता म्हणून? कि एक खूनी म्हणून???

भारतीय संस्कृती पितृसत्ताक आहे, म्हणून, आजच्या काळात स्त्री अर्भक त्यांच्या नजरेतून काय आहे? हे तितकंच महत्वाच आहे. जरी स्त्री २२ व्या शतकाकडे धावत असली तरीही अजूनही तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. मग त्यात ती स्वतःच्याच बाळाची खूनी देखील होऊ शकते...ज्या विरोध करतात त्या एकतर कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बळी ठरतात तर काही विद्रोही. 

अजन्म्या कळीला आपण उमलूच देत नाही, का? रोज सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र हातात घेते, तेव्हा मनात एक भीती असते, आज कोणत्या आईने आपल्या नवजात मुलीला मारून टाकल? आज कुठे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडेल? अश्या, एक नाही हजारो वेगवेगळे प्रकार आहेत...आजही जेव्हा बाई प्रसूत होते, तेव्हा आसपासला ज्या कोणी स्त्रिया असतात त्याच पहिला प्रश्न करतात, "काय आहे?" मुलगा म्हंटल रे म्हंटल कि सगळीकडे एकच जल्लोष सुरु होतो, आणि मुलगी म्हंटल कि सगळ्यांची तोंडे काळी का होतात?

ज्या देवीला आपण मनोभावे पूजत आहोत तिही एक स्त्रीच आहे, स्त्रीच स्त्रीत्वाचा अपमान करतेय....मग अश्या या स्त्रियांना देवी शिक्षा का देत नाही? हा प्रश्न मला लहानपणापासून पडत आला आहे, पण आता मला त्याच उत्तर सुद्धा गवसलं आहे.
ज्या घरात स्त्रीत्वाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी नांदेल तरी कशी, तिची अवकृपा होणारच.
म्हणूनच म्हंटल जात, "जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर".

आज दसरा आहे...."देवीला एकच साकड घालेन या कळ्यांना बागडू दे, जगू दे, आणि सर्वाना चांगली बुद्धी दे."

प्रिया सातपुते

Friday 19 October 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-३




रमेश खिडकीच्या कट्ट्यावर बसून एकटक आपल्या बायको कडे पाहत होता, मुग्धा त्याची बायको. परपुरुषाला तिच्या कुशीत झोपलेलं पाहून त्याला काय वाटत असेल हे समजण खूपच अवघड होत, त्याच्या चेहऱ्यावर फक्त झळकत होता तो अभिमान...आपल्या प्रिय बायकोसाठी, मुग्धासाठी...
रमेशला आज मुग्धाच एक वेगळच रूप पाहयला मिळाल होत. तिला एक छान मुलगी, बहिण, बायको, सून, वाहिनी, मैत्रीण या रुपात त्याने नेहमीच वावरताना पाहिलं होत पण, आज ती आईच्या भूमिकेत पाहून त्याला भरून आलं होत. विक्रमने इतक झिडकारून देखील ती तटस्थपणे उभी राहिली, त्याला सामोरी गेली, भूतकाळात त्याने केलेला अपमान तिने एका क्षणात पुसून टाकला, आपल्या बालमित्राला आपली गरज आहे आणि त्याच्यासाठी ती महत्वाच्या साऱ्या मिटींग्स सोडून इथे आली होती. शेवटी म्हणतात ते काही काही खोट नाही, स्त्रीही पहिल्यांदा नेहमी आईच असते.....

मुग्धाने रमेशच्या मदतीने घराची साफसफाई केली, देवासमोर दिवा लावला..किचेन मध्ये सार काही अस्ताव्यस्त पडलं होत, रमेशनी तिला थांबवलं..."नको, मी बाहेर जाऊन काही घेऊन येतो खायला, हे उद्या सकाळी पाहू". मुग्धाने होकारार्थी मान हलवली. रमेश निघून जाऊन जास्ती वेळ झाला नव्हता तोच विक्रम उठून तिच्या समोर उभा होता. त्याच्या तोंडातून शब्दचं निघत नव्हते. मुग्धाने त्याच्या कडे पाहिलं...एक भयाण शांतता पसरली होती.

शांततेत विरजण घालायचं काम फोनने केलं, मुग्धाला हॉस्पिटलमधून फोन होता....ती बोलत होती, बोलतात बोलता ती किचेन मधून खिडकी जवळ आली, तसा विक्रमपण, लहान मुलासारखा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. फोन संपताच, मुग्धाच्या कानावर शब्द पडला "मुरु", मुग्धाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होत, याच नावाने विक्रम मुग्धाला बोलवायचा.

विक्रम- मुरु!! माफ कर मला, मी नेहमी प्रेमाची आंधळी पट्टी बांधून राहिलो, माझा समोर चुकीच्या गोष्टी घडतं राहिल्या पण, मी नेहमी गप्प राहिलो, बायकोच्या प्रेमापोटी सगळ्यांना दुखवलं मी, आई-बाबांना, तुला, काका-काकूंना, मित्रांना. मला स्वतःचीच लाज वाटते आहे, ज्या आईने मला इतका मोठा केला, माझे सारे हट्ट पुरवले मी तिलाच दूर लोटलं, मी माझ्या आईलाच खोटारडी ठरवलं...(हुंदका आवरत तो पुढे बोलू लागला) बाबा, ज्यांनी माझ्याकरता स्वतःच्या इच्छया मारल्या, त्यांना मी काही नको ते बोललो. मुरु तुला तर मी कधी ओळखूच शकलो नाही ग! काही तोंडात येईल ते मी बोललो, तरी सुद्धा तू तेव्हाही मला एक शब्द नाही बोललीस...मी केलेला पाणउतारा विसरून तू माझ्यासाठी इथे आलीस..मला अजूनही तू काहीच बोलली नाहीस..मला आता सहन नाही होणार हे मुरु, प्लीज...
( बोलता बोलता मुग्धाच्या पायांजवळ कोसळून पडला.)
तरीही मुग्धाने पाठीमागे वळून पहिले नाही......

प्रिया सातपुते

Monday 15 October 2012

काही मनातलं

अजूनही वाटत मी लहानच आहे,
माणसांना ओळखायला मी शिकलेच नाही,
आडवाटेला एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली विसावून,
विचार करतेय, मी याच्यासारखी शांत का नाही?
अजूनही लहानपण सोडवत नाही,
जणू काही मला मोठ्ठं व्हायचंच नाही,
कितीही वादळे येवोत, हे झाड कसं ताठपणे उभे आहे,
मलाही कधी असच व्हायचं आहे,
भावनाशून्य? कठोर ? 
छे!! कठोर पण, प्रेमळ....
अगदी लहान मुलांसारख,
कितीही मारा, फटकारा,
ते परत येऊन गळ्यात पडतील आणि सार काही विसरतील...

प्रिया 

????



चंद्रगनिक रोज तुझ्या कला बदलतात,

रोज नवे प्रश्नचिन्हे तयार होतात,

कधी संपणार हा अनंताचा प्रवास,

कित्येक वर्ष चालत आहे,

ना थकता, ना थांबता,

एकाच आशेवर,

कुठेतरी हक्काचं घर मिळेल....




प्रिया

विवंचना

कधी कधी वाटत, 
पाऊले भरकटत तर नाहीत ना,
प्रेम करू कि नको, 
या विवंचनेत अडकून,
दूर निघून तर नाही जाणार ना ???


प्रिया 

Monday 1 October 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-२



लहान मुलं जसं, आईच्या कुशीत शांतपणे झोपी जात, तसाच, विक्रम शांतपणे झोपी गेला होता...मुग्धा त्याच्या रडून रडून सुजलेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यातला अश्रू टपकन विक्रमच्या गालावर टपकला, आणि तो झोपेतच पुटपुटला, "स्मिता, का केलंस असं तू ? " मुग्धाने हलकेच तिच्या ओढणीने तो थेंब टिपला...रमेश, मुग्धाच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिलासा देत होता. सगळीकडे एक भयाण शांतता पसरली होती.
एखाद्या कॅनवासवर हा प्रसंग रंगवला जाऊ शकतो इतकी त्याची तीव्रता अधिक होती....

मुग्धाच्या डोळ्यासमोर संपूर्ण भूतकाळ ठाण मांडून बसला होता, तो तिला डिवचत होता...तिच्याच असंख्य प्रतिकृती तिथे त्या भयाण खोलीत उभ्या राहून तिला ओरडून सांगत होत्या, तुझ्यामुळे झालाय हे सार!!...तेच दुसरी टाहो फोडून रडत होती!!...तिसरी तुझ्या त्या दिवशीचे श्राप फळले बोलून जोरजोरात राक्षसी सारखी हसत होती!!...चौथी शांत होती, तुझी यात काही चूक नाही!!....पाचवी..................अश्या असंख्य प्रतिमा तिला छळत होत्या. तिने डोळे घटत बंद करून घेतले.
सारा भूतकाळ...उभा ठाकला होता......

मुग्धा आणि विक्रम बालपणीचे जिगरी दोस्त,...दोघांनी एकाच महिन्यात, एकाच दिवशी जन्म घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं होत. दोघांच्या शाळा एक, घर पण आमने सामने. छोट्यात छोटी गोष्ट एकमेकांना सांगणे आणि मोठ्यात मोठ्ठा भांडण ह्याच दोघांच असायचं. पण, कॉलेजला त्यांचा ग्रुपला फाटे फुटले...त्याला इंजिनियर बनायचं होत आणि मुग्धाला डॉक्टर. दोघे बनलेही  आपापल्या क्षेत्रात माहीर. पण, या दोस्तीला तडा गेला जेव्हा स्मिता नावाच्या पात्राची एन्ट्री झाली. टिपिकल मराठी नाटकांमध्ये जशी खलनायिका येते तशीच स्मिता आली आणि तिने दोघांच्यामध्ये कधीही ना संपणारी दरी निर्माण केली. गैरसमज नात्यांना कायमच संपवून टाकतात हेच खर....

विक्रम पूर्णपणे एकटा होता, का? स्मिताने त्याला सगळ्यांपासून दूर नेल होत, अगदी जन्म दिलेल्या आई वडिलांपासून सुद्धा. मनुष्याला आपल्या कर्माची फळे इथेच भोगून जावी लागतात, तसचं काही स्मितासोबत झाल. विक्रमला त्याच्या घरच्यांपासून तोडलं, प्रियजनांपासून दूर केलं, मुग्धाच्या चारित्र्यावर शिंथोडे उडवले, स्वतःच्या पोटातल्या अजन्म्या जीवाला मारून टाकल, विक्रम ज्याने तिच्यासाठी सार काही केलं, त्यालाच तिने फसवलं...आणि पितळ उघड पडल्यावर तिने आत्महत्याचा डाव रचला पण, पण तो फोल ठरला, तिच्या प्रियकरानेच तिचा गळा दाबून जीव घोटला. पण, या सर्वात विक्रम पूर्ण झुरला होता, त्याला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती...त्याच मन त्याला खात राहिलं आणि आता तो स्वतःच्या जीवावर असा उठला होता.

मुग्धाने मनाशीच निश्चय केला, आणि ती रमेशला बोलली, "मी विक्रमला असं हरू नाही देणार...त्याला जगावं लागेल, स्वतःसाठी, काका-काकूंसाठी, आपल्यासाठी, मी त्याला असा संपू नाही देणार." हुंदका आवरत ती बोलत होती, रमेश अवाक होऊन पाहतच राहिला...मुग्धाच निरपेक्ष प्रेम.....................

प्रिया सातपुते 





शब्द



किती दूर लोटू या शब्दांना ? तरीही डोळ्यासमोर नाचत राहतील, कानांमध्ये गुणगुणत राहतील, मनामध्ये सलत राहतील...

तेच तर आहेत फक्त मला समजून घेणारे, आणि त्यांनाच दूर लोटून कुठे जाऊ मी ?

सार जग सोडून जाईल पण हे मात्र नेहमी साथ देतील.

सप्तपदी घेऊन एक नात जन्माला येत पण या शब्दांनी तर कधीच कोणती आस धरली नाही.

ते फक्त माझ्या हृदयात येऊन काहूर माजवतात, कशी मी दूर लोटू या शब्दांना ?

किती पराकोटीचे प्रयत्न करू कि ते होतील थोडेशे दूर, श्वास घेतील स्वातंत्र्याचा.
पण, हि प्रिया पुन्हा हरवली तर ? मग, शब्दच शोधून घेऊन येतील या  प्रियाला.

प्रिया 

Thursday 27 September 2012

ती आणि तो

"तुला जे समजायचं ते समंज, मला आता हि रिलेशनशिप पुढे न्यायची नाही"....असं बोलून तो, माघारी फिरला....
वाळूत त्याच्या पायाचे ठसे उमटले होते, ती त्याच्या पाठमोऱ्या प्रतिकृतीकडे पहातच राहिली. समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा तिला स्पर्शून जाग्या करत होत्या कि बोलावत होत्या? हेच तिला उमगत नव्हते, ज्याच्यासोबततिने जगण्या मरणाच्या शपथा घेतल्या होत्या, तो तिला सोडून गेला होता. मटकन ती खाली बसली, आसवांचा बांध आता तुटला होता, तीच सर्वस्व लुटून तो निघून गेला होता.
तिला कळत नव्हत, कि हसायचं कि रडायचं.
रोज ती जिथे तो शेवटचा भेटला होता, तिथे येऊन त्याच वेळी, त्याच जागेवर, त्याची वाट पहायची.
तिने ठरवलं होत, जोपर्यंत तो लग्न नाही करत, तिही नाही करणार.
कालांतराने तिच्या हातात पत्रिका पण आली, ती त्याच्या लग्नाला आवर्जून गेली, त्याला सुखात पाहून ती, चुपचाप तिथून निघाली. शेवटच पत्र गुलाबी पाकिटात ठेऊन तिने, ती जागा गाठली जिथे ती नेहमी जायची, त्याची वाट पहायची. ते परत कधीच न परतण्याकरता.
तिने ना त्याला जबाबदार धरले ना श्राप दिले. तिच्या शेवटच्या शब्दात पण तोच होता.
दिवस लोटले, नियतीची चाके फिरली, तो लग्न करून फसला होता, लग्नाच्या काही महिन्यातच त्याची धर्मपत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्याला माहित होत, त्याच्याकडे अजूनहि तिचा पर्याय आहे. शेवटी जिथे तो तिला सोडून गेला होता, तिथे जाऊन त्याने तिची वाट पाहिली, पण ती कुठेच नव्हती. तिच्या मैत्रिणीकडे गेल्यावर, त्याला घडला प्रकार कळला.
ते गुलाबी पाकीट घेऊन तो तिथेच आला. पाकीट उघडणार तोच तिचा आवाज त्याच्या कानी पडला, त्याने घाबरून पाहिलं, गुलाबी पाकीट हातातून गळून पडल.
ती समोर उभी होती, "मला माहित होत, तू येशील, एकदा तरी पाठीमागे वळून पाहशील, पण, आता माझ्या पाठी नको येऊस , परत फिर, आयुष्य सुंदर आहे....
तो तिथेच कोलमडून पडला, गुलाबी पाकीटाजवळ.
ती त्याला जगायला शिकवून गेली होती.....

प्रिया सातपुते









Wednesday 26 September 2012

आयुष्य खूप सुंदर आहे...

कधी कधी वाटत आयुष्य जगायचंच राहून गेल आणि कधी वाटत बसं, खूप झालं, थकून गेले मन, शरीर आणि आत्मा...पण, खरच, अस आहे? अस घडत?

ज्या शरीरावर मी अतोनात प्रेम करते, ज्या चेहऱ्याला मी रोज आरश्यात निहारते...त्याच्यावर मी थकेन ?
आणि उत्तर अर्थात "हो" असेल. रोज मी या मनासोबत नवे नवे खेळ खेळत असते...कधी प्रेमाचा? कधी भावनांचा? तर कधी स्वतःसोबत चालू असलेल्या दंद्वाचा.

रोज सकाळ होते आणि नवा दिवस नवा डाव मांडतो, मग त्यात मीच प्याद असते...आणि मीच राणी!!
मीच ठरवते कि कोण जगणार आणि कोण....!!
आयुष्य इतक सोप्प का नाही? मर म्हंटल कि मरता याव अन अनंतात विलीन होऊन जाव.

खरेच का आत्मा असेल? मग या करता पण मरूनच पहाव लागेल ना ? तस पण, एकदा मरण ज्याला चुकले त्याला ते परत हे येतच..मग पटकन का येत नाही?

देवाने इतके का क्रूर बनावे? यातना देताना तो एक पत्र का देत नाही? खुपजण बोलतात कि पुनर्जन्माचे कर्म या आयुष्यात पण भोगाव लागत. मग, तो जन्मालादेखील न आलेल्या पाखरांना पण का घेऊन जातो? पापी लोकांना खूप श्रीमंत आणि आनंदात ठेवतो, आणि प्रेमळ लोकांना झटक्यात घेऊन जातो.
त्रास न होता मरण येन ह्यातच सुख आहे, तर तो प्रत्येक क्षणाला का मरण दाखवतो? एकदाचा घेऊन का जात नाही?

आयुष्य खूप सुंदर आहे...पण त्यात हा पण नसता तर ते खूपच रटाळ झाल असत..सगळ्याच जर ऐश्वर्या सारख्या सुंदर असत्या तर मग हेली बेरी पण नसती ना!! म्हणून बोलल जात, मनाला जिंका,...
म्हणजे कधीच नाही वाटणार कि आयुष्य जगायचं राहून गेल....
Keep fighting,
Keep loving,
Keep praying
       &
Keep believing
प्रिया सातपुते

प्रतिबिंब


आज आरश्यातल प्रतिबिंब;
माझावरच हसतंय,
कोण तू? 
म्हणून मलाच प्रतिसवाल करतंय,
आज माझ प्रतिबिंब मलाच हसतंय....
का? कोणास ठाऊक? 
ते एकटच का हसतंय!
खुदकन हसून ते मलाच चिडवतंय,
आज माझ प्रतिबिंब माझ्याशीच गेम करतंय!!

प्रिया

Sunday 16 September 2012

पाऊस पडून गेल्यावर.........


 पाऊस पडून गेल्यावर.........
तुझी चाहूल लागते,
झाडाखाली रुसून बसलेल
माझ मन मग,
आणखीनच फुगून बसत,
तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या,
टपोऱ्या थेंबाना त्याला,
स्पर्शायचं असत,
पण, गालावरच्या माझ्या 
लाल रागाकड पाहून ते तिथेच थांबत.

पाऊस पडून गेल्यावर.........
एक नवा गारवा फुललेला असतो,
पक्षी पंखावरचे चिंब पाणी फडफडतात,
माझ मन ही मग एक कटाक्ष तुझ्यावर टाकते,
पण, माझ्या चिंब शरीराकड पाहून,
माझ मन हसत मात्र नाही.

पाऊस पडून गेल्यावर.........
इंद्रधनू आकशात सजत,
आकाश पण खुश होऊन,
त्याचे रंग फुलवत,
हळुवार पाऊले टाकत,
तू माझ्यासमोर कान पकडून हसतोस,
मी आणि माझ मन मात्र एकदम तटस्थ असत.

पाऊस पडून गेल्यावर.........
सूर्य पण हात पसरवतो,
फुले पण मग ओलीचिंब असूनही,
फुलापाखरांना साद देतात,
तुझ्या हसऱ्या ओलसर,
चेहऱ्याकडे पाहून मग,
माझा ही राग वितळून जातो.

पाऊस पडून गेल्यावर.........
रुसलेल माझ मन,
पावसानंतरच्या गारव्यात,
विलीन होऊन जात.

-प्रिया सातपुते

Saturday 15 September 2012

पाऊलवाट




मनाच्या पाऊलवाटे वर
उभे आहे कोणीतरी, 
कटाक्ष प्रेमाचा 
करतो आहे प्रवास कमी,
प्रवासाच्या या रगाड्यात 
उभे आहोत आपण दोघेही एकाच पाऊलवाटे वर 
पण,
पाऊलवाटे वर चालू शकतो 
फक्त एकच व्यक्ती, 
पाऊलवाटेच्या या प्रवासात 
कोणी प्रथम चालायचं?
हाच होत आहे एक गम्य प्रश्न,
आणि प्रश्नच उत्तर देतोय आपण दोघेही एकच....


प्रिया 

चारोळी


क्षितिजाच्या पुलावरून चालताना 
हे जग एकटच असत,
वास्तवाच्या पूलावरून चालताना मात्र
आपणच या जगात एकटे असतो.

-प्रिया 

चारोळी



आज मरणाला मला सांगायचय
प्रत्येक क्षण मला फुलवायचाय
फुललेल्या क्षणांत रंग उधळून
मला पुन्हा एकदा जगायचाय


प्रिया 

प्रश्न

प्रेम आणि अपेक्षा 
ह्या एकमेकांना पूरक असतील तर 
नाती अबाधित राहतात...
पण जेव्हा अपेक्षा उपेक्षा बनते 
तेव्हा नक्की घडत तरी काय ?

प्रिया 

अशीच सुचलेली कविता



तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या
अश्रुंना मला थोडस चाटून पहायचय
का?
तर ते खारटच आहेत कि तिखट
हे मला तपासून पहायचय.

तुझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या
रेषांना मला स्पर्शुन पहायचय
का?
तर त्या चिंतातूर आहेत कि रागावलेल्या
हे मला पहायचंय

तुझ्या आसुसलेल्या हातांना
मला घट्ट पकडायचंय
का?
तर त्यांना हातात घेऊ कि गालांवर हेच मला उमगायचंय.


प्रिया


Thursday 13 September 2012

शायरी



ये तनहायीया  सिसक रही है
मेरे अरमानो की मौत पर
उम्मीद है मुझे
तुम उनपर फूल रखने तो जरूर आओगे!!

चारोळी


तुझ्या अर्धवट
पाणी भरलेल्या डोळ्यात
बघण्याच माझ साहस नव्हत
कारण माझच चुकल होत.

-प्रिया

चारोळी



वाहतो आहे वारा 
शुभ्र  वाळवंटात 
पडतो आहे मी 
निस्सीम प्रेमात.

-प्रिया  



Monday 3 September 2012

Dedicated to Friend



काही अनोळखी माणसे
हळूच आपल्या आयुष्यात येतात 
मांजर पावलांनी हळूच
आपल्याला एका नवीन दुनियेत घेऊन जातात
चेहऱ्यावरच हसू कधी थांबतच नाही
जणू आपण रडण विसरून जातो...
सिगारेटच्या धुरात आयुष्य कस सुंदर दिसत जणू हेच ते शिकवतात
वेगासच्या क्लब मध्ये मज्जा करायला शिकवतात
छोट्या छोट्या गोष्टीत टोमणे मारून हसायचं कस हे शिकवतात
काही माणसे स्वतःचा बर्थडेची आठवण करून देतात
ROFL करत शुभेच्यांची वाट पाहत असतात
काही माणसे अशीच असतात जुन्या वाईन सारखी
जितकी कुजलेली तितकीच गोड आणि महाग असतात...



प्रिया


Tuesday 28 August 2012

कुंडलीच्या पळवाटा...



आज मनात एक वेगळ्याच विचारांचं काहूर माजलाय, पहाटेचे ५ होत आलेत, पण तरीही मला झोपेन ग्रासल नाही याची खंत मनाला नक्कीच आहे, पण अंधश्रद्धेच जे काळे ढग आजूबाजूला पाहते तर मनात पाल चुकचुकते.

माझी प्रिय आई हल्ली एका वेगळ्या चिंतेने ग्रासली गेलीय, एका झाडाखाली बसणाऱ्या ज्योतिष्याने म्हणे माझी कुंडली पहिली आणि तो म्हणाला, मुलगी फार छान आहे, पण मनासारखा वर भेटत नाहीय, मंगल आहे, मग काय माझ्या बिचार्या आईला बरच काही सांगून त्यांन भीती नक्कीच दाखवली, वरती त्याने तिला आपण नवीन कुंडली काढून पण देतो आणि का देतो यावर पण प्रवचन दिल। मी आणि बाबांना वेळ नाही लागला तिच्या डोक्यातल हे भूत काढायला. जो माणूस स्वतः इतक्या वर्षांपासून हा धंदा करत आहे, एका पोपटाला जवळ घेऊन, पण त्याला स्वतःच भविष्य सांगता नाही आल का? कि तो किती वर्ष त्याच झाडाखाली हे काम करणार आहे?? आणि किती माणसाना असा खुळ्यात काढणार आहे.

असो, मुद्दा हा नाही कि वयाने मोठी माणसेच अशा भूलथाप्पाना बळी पडतात, पण काही माणसे याचा वापर माणसाना घाबरवण्या करता पण करतात.
माझी एक मैत्रीण, परजातीच्या मुलाच्या प्रेमात पडली होती, दोघे कितपत एकमेकावर प्रेम करत होते हे एक प्रश्न चिन्हच आहे? पण जेव्हा मुलीपासून सुटका हवी म्हणून त्याने अतिशय बालिश आणि मूर्खपणाचा कळस गाठला, कुंडली मध्ये थोडा काय मोठाच लोचा आहे, प्रेम करताना तर पहिली नव्हती कुंडली पण लग्न करताना बरोबर कुंडली आली आणि त्याने छान पळवाट पण काढली.

अशेच काही किस्से, माझा मित्रानसोबत पण झालेत, त्यातला एक मित्र जो अशा गोष्टींच्या इतका आहारी गेला होता कि त्याच्या प्रत्येक बोटात एक अंगठी असायची,का? तर एक शांती करता, एक गुरु करता, एक शनी करता.

हे बाबा लोक समोरच्या माणसाला इतके घाबरवून टाकतात कि त्यांची विचार करण्याची शक्ती क्षीण होते, आणि ते त्यांच्या आहारी पडतात, किंवा मनोबल हरवलेल्या व्यक्तींना आणखीन घाबरवून, ते उपाय पण सांगतात आणि तितकीच मोठी रक्कम उकळतात.

माणूस जेव्हा पहिला श्वास घेतो तेव्हाच त्याच आयुष्य सुरु होत, आणि जेव्हा तो परमेश्वर नावाच्या या शक्ती समोर लीन होतो तेव्हा तो सगळ्या भूल्थाप्पान पासून दूर राहतो. देव आपल्या मनात वास करतो. प्रत्येक श्वासात तो आहे आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने त्याला आपल्या मनात विराजमान करतो तेव्हा अशे हे उपद्रवी, मूर्ख, ढोंगी लोक आपल काहीच बिघडवू शकत नाहीत.

कर्म करत राहा आणि वर्तमानात जगा, कोणीही दुसरी व्यक्ती तुमच भविष्य सांगू शकत नाही, ते फक्त तुम्हीच घडवता, तुमच्या हातानी.

।।सुखी भवन्तु।।

प्रिया सातपुते


Monday 6 August 2012

"सेकण्ड इंनिंग" भाग-१


सकाळपासून सिगरेटच्या धुराने पूर्ण घर भरून गेल होत, तरीपण विक्रमला शुद्ध नव्हती, एका पाठोपाठ एक सिगरेटस...आणि साथ द्यायला बियरचे कॅन दिसतच होते...
मधेच तो शिव्या देत होता, मधेच रडत होता....संध्याकाळ होऊन काळोख पडला तरीपण त्याला शुद्ध नव्हती...दरवाज्यावर कोणीतरी ठोकत होत...पण तो काही उठून दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता...हळूहळू दारावरचे ठोके जोरात वाजू लागले, अस वाटत होत कि दरवाजा तोडला जात आहे,...जोरात आवाज झाला धाड.....चार-पाच लोक लगबगीने आत आले...एक २८ वर्षाचा तरुण पुढे येऊन विक्रम वर ओरडू लागला,"साल्या तुला काय  कळत कि नाही...काय आहे हे"...
बाकीचे दोघे खिडक्या उघडतात, पंखा सुरु करतात, दिवे लावतात,...दोन मुली तश्याच मगासपासून दारात उभ्या होत्या, तशी त्यातली एक पुढे येऊन विक्रम जवळ जाऊ लागली..."मुग्धा थांब नको जूस त्याच्या जवळ, it's not safe to talk to him now"....
पण मुग्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, ती विक्रमकडे जाऊ लागली...तसा विक्रम चेताळला,"जवळ येऊ नकोस तू, चालती हो, मला कोणाशीच काहीच बोलायचं नाही, निघा इथून.. मुघ्धा त्याच्या समोर जाऊन बसली, तसा तो तोंड फिरवू लागला, उठण्याचा प्रयत्न करणार तोच...मुग्धाने त्याला मिठीत घेतलं...त्याच्या अंगाला दारू, सिगरेटचा वास येत आहे याची परवा न करता...विक्रम तिच्या वर ओरडू लागला..आणि क्षणात तो मुग्धाच्या मिठीत रडू लागला...छोट मुल जस आईच्या मिठीत जाऊन लपत आणि स्वतःला सुरक्षित करत अगदी तसच तो करू पाहत होता...मुग्धा त्याला समजावत होती...तसा त्याचा  बांध  पूर्णपणे सुटला होता..तो ओक्साबोक्शी रडत होता...
खोलीत अजूनही सिगरेटचा वास येत होता...पण त्यात आता भर पडली होती ती विक्रमच्या अश्रूंची...पर्वतासारखा खंबीर, मनकवडा, प्रेमळ, शांत, तडफदार...अश्या शब्दात त्याचे मित्र, मैत्रिणी त्याला ओळखायचे...आणि आज तोच पर्वत ढासळून गेला होता...स्मिता उर्फ त्याच आयुष्य..त्याची प्रिय बायको त्याला कायमची सोडून निघून गेली होती...स्मिताला जाऊन दोन आठवडे झाले होते, पण विक्रम टस कि मस झाला नव्हता, तो शांतपणे ऑफिसला जात होता, येत होता, कोणाशीच बोलत नव्हता, पण गेले दहा दिवस तो कुठेच फिरकला नाही, सगळे त्याला फोन करायचे तरी तो उचलत नव्हता, स्मिता गेल्याच दुख त्याने दाबून टाकण्याकरता सिगारेट आणि दारू पत्करली होती हे साफ दिसत होत, गेले दोन दिवस तो घराबाहेर आलाच नाही, फक्त धूर आणि एकांत यातच तो आयुष्य संपवायला निघाला होता.
रमेशने मुग्धाला घडलेला सारा प्रकार फोनवरून कळवला होता, मुघ्धा आणि विक्रम जिवलग मित्र...स्मिता गेलेवर ती येऊन गेली होती..पण विक्रम असा तुटेल अस तिला स्वप्नात पण वाटल नव्हत....दिल्लीहून ती पुण्याला जशी पोहचली ते विक्रमच घर तिला आणखीच दूर वाटू लागल होत....तिच्या पोटात भीतीने गोळा आला होता..डोळे पाणावले होते...घराच दार तोडताना ती डोळे मिटून उभी होती...रमेश जाऊन जसा विक्रमवर ओरडला तसा तिच्यात धीर आला आणि तिने डोळे उघडले...समोर पडला होता तिचा मित्र कि प्रेत...त्याच ते रूप पाहून ती सुन्न झाली होती..हळू हळू पुढे जात ती त्याच्या समोर बसली ते एक आई म्हणून,...

प्रिया सातपुते

Sunday 22 July 2012

रंग


वेगवेगल्या रंगात मी कशी दिसेन?
याची मला खुप भीति वाट्त होती,
नेहमी पांढरा अन काळा हेच माझे रंग,
पण, जेव्हा मी हिरवा रंग चढ्वला,
तेव्हा मी चक्क सुंदर दिसते आहे,
याचच मला अप्रुप वाटल,
आरश्यासमोर उभी राहुन,
मी स्वत:ला जणू शोधत होते,
गालावर छोटीच पण,
खुदकन खळी हसली होती,
नव्या प्रियाला मिठ्ठीत घेताना,
ती गुलाबी होऊन लाजली होती....


    प्रिया





Saturday 30 June 2012





लहानपणी सावल्यांशी खेळताना खूप मज्जा यायची,
वेगवेगळे आकार, कल्पना आणि मज्जा...
पण तेच रात्र होताच त्या सावल्या भूतावाल्यांच रूप घ्यायच्या,
आईच्या कुशीत जणू एक ओलावा, शांती जाणवायची,
आणि आता त्याच सावल्या खूप मोठ्या होऊन, 
रोज रात्री एक प्रश्न घेऊन येतात,
आता पुढे  काय?


    प्रिया

Friday 15 June 2012

पाखरू



                                     
मन पाखरू पाखरू पाखरू...
झेपावते आभाळी,
जणू साऱ्या मोहातून
ते मुक्त झाले.....


प्रिया 

 

वास्तव


  
मोरपीस गालांवर फिरावं अन
सारी स्वप्न पूर्ण व्हावी
डोळे उघडताच स्वप्न्तील गोष्ट
समोर उभी असावी
पण आयुष्य....असत का इतक सोप?
स्वप्नातल्या परी प्रमाणे कोणी याव
अन जादूची छडी फिरवावी....
वास्तव इतक भयाण, कठोर का असते?
क्षणा क्षणाला इथे नात्यांचा खेळ, प्रेमाचा छळ...
जिथे पाहाल तिथे क्रूर हत्या...
अजन्म्या पिल्लांचा खून...तिथे जिवंत माणसाला कसली आली किंमत ???



प्रिया

व्यथा



आसवांची भाषा कोणालाच उमगत नाही,
त्यांचा फक्त एकच मित्र असतो
तो म्हणजे लुकलुकणारे डोळे,
सुखात दु:खात,
सगळीकडे साथ देतात...
सगळेजण साथ सोडतील,
पण डोळे आणि अश्रू हे नेहमीच एकत्र राहतील,
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत........

प्रिया


Thursday 14 June 2012

सुंदर मन माझ



                               
                                
                 
सुंदर मन माझ ,
मोरपिसासारख नीळ नीळ?
कि
मावळणाऱ्या गुलाबी ढगांसारख?
सुंदर मन माझ...
ना रंग उमगे मला न भाव,
प्रत्येक क्षणी याचा वेगळाच डाव!
सुंदर मन माझ...
कोणाच्या प्रेमात पडलेलं?
न त्याला काळे कि हे प्रेम!
सुंदर मन माझ...
नव्या दिवसाला समोर जाणार,
रात्रीत अंथरुणात हमसून रडणार,
कोणाच्या आठवणीत हेच त्याला न ठाव!
सुंदर मन माझ...
ओठावरच गुलाबी हसण,
आणि मनातून कला रंग,
यांना कधी ओळखणार हे
सुंदर मन माझ....

प्रिया

Saturday 21 January 2012

Mukhavata...

  

Lahan astana jatre madhe khup sare mukhavate pahile. Tyat kahi hasare

hote tar kahi bhayanak...

Pratek mukhavatyachi ek gosht aste, ek rahsya asat..

Aaj vatat he mukhavate mala lahan astana kay sangaycha prayatn

karayche! Pratek mukhavata mala aayushya baddal sangat hota..

Roj hech mukhavate chadhavun mi vavrate, prateka mage dadlay ek gupit,

te gupit dusar tisar kahi nasun te ahe aayushya kas jagaych?

Mukhavate chadhavun jevha mi vavrate tevha mala aaspas pahilyavar

janaval ki mi ekati nahiy, saglech mukhavata ghalun vavartat. Kadhi

hasara tar kadhi radka, kadhi ragit tar kadhi premal.

Mukhavtyanchya bajarat hava tya ranga cha mukhavta milan khup avaghad

ahe pan to banvan titakach soppa ahe...

Priya

Friday 20 January 2012

Ekati

         

मी एकटी, एकटी मी,
कोणी नाही हो मला,
नकोय ती भिकारी लक्षण,
पसरवायचा नाही हो मला हात,
जगायचं मला मानान,
कोणी देईल का हो मला नोकरी?
नकोय ती वैश्यापानाची कमाई,
हवीय मला कष्टाची भाकरी,
करीन काहीही हो,

नाही! नाही! जो तो या देहाचा भक्षक,
आहे मी एकटी,
                                                                                   मी एकटी!