Wednesday 26 September 2012

आयुष्य खूप सुंदर आहे...

कधी कधी वाटत आयुष्य जगायचंच राहून गेल आणि कधी वाटत बसं, खूप झालं, थकून गेले मन, शरीर आणि आत्मा...पण, खरच, अस आहे? अस घडत?

ज्या शरीरावर मी अतोनात प्रेम करते, ज्या चेहऱ्याला मी रोज आरश्यात निहारते...त्याच्यावर मी थकेन ?
आणि उत्तर अर्थात "हो" असेल. रोज मी या मनासोबत नवे नवे खेळ खेळत असते...कधी प्रेमाचा? कधी भावनांचा? तर कधी स्वतःसोबत चालू असलेल्या दंद्वाचा.

रोज सकाळ होते आणि नवा दिवस नवा डाव मांडतो, मग त्यात मीच प्याद असते...आणि मीच राणी!!
मीच ठरवते कि कोण जगणार आणि कोण....!!
आयुष्य इतक सोप्प का नाही? मर म्हंटल कि मरता याव अन अनंतात विलीन होऊन जाव.

खरेच का आत्मा असेल? मग या करता पण मरूनच पहाव लागेल ना ? तस पण, एकदा मरण ज्याला चुकले त्याला ते परत हे येतच..मग पटकन का येत नाही?

देवाने इतके का क्रूर बनावे? यातना देताना तो एक पत्र का देत नाही? खुपजण बोलतात कि पुनर्जन्माचे कर्म या आयुष्यात पण भोगाव लागत. मग, तो जन्मालादेखील न आलेल्या पाखरांना पण का घेऊन जातो? पापी लोकांना खूप श्रीमंत आणि आनंदात ठेवतो, आणि प्रेमळ लोकांना झटक्यात घेऊन जातो.
त्रास न होता मरण येन ह्यातच सुख आहे, तर तो प्रत्येक क्षणाला का मरण दाखवतो? एकदाचा घेऊन का जात नाही?

आयुष्य खूप सुंदर आहे...पण त्यात हा पण नसता तर ते खूपच रटाळ झाल असत..सगळ्याच जर ऐश्वर्या सारख्या सुंदर असत्या तर मग हेली बेरी पण नसती ना!! म्हणून बोलल जात, मनाला जिंका,...
म्हणजे कधीच नाही वाटणार कि आयुष्य जगायचं राहून गेल....
Keep fighting,
Keep loving,
Keep praying
       &
Keep believing
प्रिया सातपुते

1 comment:

Post a Comment