Sunday 6 April 2014

एक वॉरियर-बाळासाहेब दराडे!


बाळासाहेब दराडे, एक उच्चशिक्षित युवा, अमेरिकेसारख्या देशातलं सुखदायी, प्रशस्त आयुष्य सोडून पुन्हा आपल्या गावी परतलेला…लोणार तालुका, जिल्हा बुलढाणा. चक्कं एका खेडेगावात. पहिल्यांदा तुम्हां सर्वांना वाटेल, "काय, पागल आहे हा? काय ठेवलय भारतात? का परतला? ब्रेक घेत असेल म्हणून आला असेल…" अशे बरेचं विचार मनात चाळवले गेले असतील. याचं एकचं उत्तर तो परत आला आपल्या मातृभूमीसाठी, या भारत देशासाठी!

अमेरिकेतला हा विकेंड वॉरियर, देशातल्या प्रत्येक गोष्टींचा आढावा घ्यायचा, त्याचंही रक्त सळसळून उठायचं, देशासाठी काय करता येईल या विचाराने तो झपाटलेला होताच. आपल्या गावाकडील मुलांना, लोकांना मदत व्हावी या उद्देशाने त्याने एक संस्था काढली, "शंकरा ग्राम परिवर्तन". दर सुट्टीला येउन तो काही न काही करून जाऊ लागला. पण, त्याच्या आतला "सच्चाईचा किडा" काय त्याला स्वस्त बसू देइना, त्यात त्याला मार्ग दाखवला तो श्री. श्री. रविशंकरजीनी अर्थात गुरुजींनी, आणि देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामयांनी. त्यांच्या आश्वासक शब्दांच्या घेऱ्यात विचार करत असतांनाच, माननीय अन्ना हजारेंच भ्रष्टाचाराविरोधी चालू असलेल्या आंदोलनामुळे हा विकेंड वॉरियर पेटून उठला, मनाचा निश्चय करून भारतात परतला. सुरुवातीला समाजसेवाच करणार आहे असं घरच्यांना सांगून या विकेंड वॉरियरने थेट अण्णांना गाठलं, त्यांच्या सोबत राहून चळवळीला हा विकेंड वॉरियर उभा ठाकला.

मूळचाच हुशार, धाडसी, वृत्तीच्या या विकेंड वॉरियरकडे सुप्त अशे बरेचं गुणही आहेत. हा वॉरियर आर्ट ऑफ लिविंगचा अध्यात्मिक शिक्षक देखील आहे. त्याने २०११ मध्ये अमेरिकेत भारतीय, अमेरिकन तरुणांना घेऊन अण्णांच्या आंदोलना समर्थनात रैली देखील काढली. हा विकेंड वॉरियर छे,छे! वॉरियरच आहे!
भ्रष्टाचाराशी दोन हात करायला हा वॉरियर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहिला तो, एका ब्रिदावर, "ना जात, ना पात, ना पक्ष! ग्राम परिवर्तन एकचं लक्ष." घरच्यांनी माघार घ्यायला सांगितली तरीही तो ठाम राहिला, अन चक्क ५०% मतांनी अजिंक्य झाला. पैसा, मटण आणि दारू शिवायही जिंकता येत हे या वॉरियरने सिद्ध केलं आहे. भ्रष्टाचाराला न जुमानता, एकही पैसा न चारता, हा पठ्ठ्या एकेक उपक्रम यशस्वी करतच गेला…अन, आता तो उभा ठाकला आहे लोकसभेच्या निवडणूकीसाठी! ग्रेट भेट मध्ये वागलेनी या वॉरियरला शेवटचा प्रश्न केला, "जिंकलात तर आनंद आहे, जिंकला नाही तर काय?" त्याचं उत्तर इतकं समर्पक,"मी निवडणूकीला उभं राहाण, लढण यातच माझा विजय आहे, राजकारण, पद, प्रतिष्ठा हा माझा उद्धेश नाही, राजकारण बदलण हा माझा उद्देश आहे."

स्वतःच्या स्वः ला सोडून अशी मोजकीच माणसे समाजाला बदलण्यासाठी पुढे येतात, देशातलं जाती धर्माचं राजकारण कायमच संपवण्यासाठी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला एका सुंदर, प्रगत, भ्रष्टाचारमुक्त भारत देशाकडे नेत आहेत. साथ द्या, पुढे या! 

मतदान करा, स्वतःचा हक्क बजावा! अन्यथा चार वर्षे मुग गिळून बसा!

*वॉरियरच्या अर्थात बाळासाहेब दराडेंच्या बद्दल अधिक व्ययक्तिक माहिती, उपक्रम, कार्यांबाबत जाणून घेण्यासाठी विझिट करा खाली दिलेली लिंक.
http://www.balasahebdarade.org/#!bio/csgz

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment