Tuesday 11 November 2014

प्रियांश...५८

काही दिवसांपूर्वी माझी ११-१२वीची मैत्रीण अचानक घरी आली! मला धक्काच बसला, माझ्या भावाच्या लग्नात ती राहून गेली होती इतकी घट्ट आमची मैत्री होती! माझ्यासमोर काय कस बोलायच हा प्रश्न तिच्या चेहरयावर आवासून उभा होता! मी मात्र काही झालच नाही या आविर्भावात बोलत होते, फोन नंबरही घेतला!गळ्यातल न दिसणार मंगळसुत्र पाहून मीच विचारल, " लग्न झाल का तुझ?" यावर संकोचुन हो बोलत तिने पळ काढला, मेबी शी वोझ फिलिंग गिल्टी!!! ऑर नॉट!!!!

आमची मैत्री तुटली, तुटलीच म्हणाव लागेल! या मागच कारण तस वैलिड आहे, सायन्स सोडून ती आर्ट्सला दुसरया कॉलेजमधे गेली, त्यावेळी मोबाईल होते कुठे? असले तरी ते आम्हाला मिळाले नव्हते! दोघी आपापल्या आयुष्यात बिजी झालो, तरीही फ्रेंडशिप डे, सनवारंना फोन करून विश करायचो! मग हळुहळु तेही बंद झाल, एकमेकींच्या नव्या आयुष्याच्या पानात नवे मित्रमैत्रिणी जोडले गेले, अन आमची मैत्री धुसर होत गेली. कुठेतरी इगो आला, मीच का फोन करायचा नेहमी! पण, इगोवर मात करून एकदा फोन लावला देखील, तेव्हा जे बोलन झाल ते शेवटच! शेवटी कोणतही नात फक्त एकाच बाजूने सावरता येत नाही हेच खर! 

प्रत्येक नात्याची एक्सपायरी डेट असते हेही पुन्हा एकदा सिद्ध झालं!!!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment