Thursday 12 December 2013

प्रियांश...१५

जगण कसं असावं? बेभान, स्वच्छंदी पक्ष्यासारख, वाटेल तेव्हा भरारी घ्यायची, मनात आलं कि बागडायचं, या क्षणात भरभरून जगून घ्यायचं… समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून मनाला मुरड घालत जगतच आले अन जेव्हा स्वतःला चांगलं वाटेल असं जगायला शिकले तेव्हा नाके मुरडणारे कमी नव्हते…प्रत्येक माणसाच्या मनाला आवडेल असं आपण वागू शकत नाही…म्हणून आपण आपला विचार करावा…बाजूचा काय बोलतोय? पाठीमागून किती गाणी गात आहेत? हे सार दुय्यम आहे…स्वतःच्या मनाला, विचारांना जे पटेल तिथे दामटून बसावं अन आपल्या आयुष्याचा आपणच राजा वा राणी व्हावं… 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment