Monday 14 July 2014

प्रियांश...40

जात ही माणसाच्या मनात, रक्तात इतकी बिंबवली गेली आहे की काय सांगु, ती सावली सारखी सगळीकड़े पिच्छा पुरवते. एक घड्लेलच उदाहरण देते...

एका मैत्रिणीने ऑनलाइन वधुवर मंडलात नाव नोंदवल होत...दिसायला देखनी, कर्तबगार, पाच अंकी पगार...तिला एका समजातीय मुलाने लग्नासंधार्बत फोन केला, दोघेही बोलले, त्या मुलाचे वडिल तिच्याच जातीचे होते पण, आई उच्चवर्णीय जातितली होती, तिला अप्रूप वाटल, ही गोष्ट तिने मला लगेच सांगितली, मी तिला सावध केल पण, तिला ते रुचल नाही. दुसरया दिवशी त्या मुलाने तिला फोन केला नाही फ़क्त मेसेज करून नकार पाठवला. ऑफिस सुटताच तिने त्याला फोन लावला कारण, दोघांच बोलन आधीच झाल होत, त्याला ती पसंत होती, मग घडल तरी काय? तिला उत्तर हव होत, तो फोन उचलत नव्हता, शेवटी तिने त्याला मेसेज करून विचारल, काहीच उत्तर आल नाही. घरी पोहचून तिने पुन्हा एकदा फोन केला, त्याने तिला उत्तर दिल, त्याचा आवाज दबला होता, तो म्हणाला माझ्या आईला आंतरजातीय लग्न चालेल पण, खालची जात नको आहे, सॉरी बोलून त्याने फोन कट केला. ती एखाद्या मृत बाहुली सारखी उभी होती...

मनाच्या चिंधड्या, तिच्या गालावरून ओघळत होत्या, ती फ़क्त विचारत राहीली, "कधी संपणार हे प्रिया, किती चटके सोसायचे या जातीचे?" मी चेहरयावर एक कुस्हीत हास्य आणून म्हंटल होत, "आपल्या शेवटच्या श्वासाबरोबर..."

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment