Tuesday 1 July 2014

प्रियांश...३९

एखाद्यावर जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा, तो किंवा ती जे काही म्हणेल तेचं आपण करतो…त्याला दुखावू नये म्हणून आपण त्याच्या प्रत्येक हो मध्ये होच म्हणतो…काळ सरतो अन मग जाणीव होते आपण स्वतःहूनच स्वतःभोवती एक जिवंत साप गुंडाळून घेतला आहे…त्याच्यापासून वाचायचं कसं? मग त्याच्यासोबतच डुलू लागतो अन मग तोच सर्वकाही वाटू लागतो…मग, एके दिवशी हाच साप कधी गळ्याचा चावा घेऊन दुर निघून जातो हे कळत देखील नाही…अश्या या सापाला आपल्याच मानगुटीवर पोसायचाच कशाला? प्रत्येक माणूस हा एक जीव आहे, त्याचं स्वतःच एक वेगळ अस्तित्व आहे…आणि जेव्ह्या या अस्तित्वावर घाला बसतो तेव्हा माणूस आयुष्यातून उठतो…कारण, प्रेमापोटी आंधळे बनून, तुम्ही स्वतःच स्वः विसरून जाता अन स्वतःवर प्रेम करण देखील…

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment