Thursday 12 June 2014

प्रियांश...३८

आजकाल जातीयता sophisticated झाली आहे, माणूस कितीही शिकला तरीही तो जात सोडायला तयार होत नाही, आणि माणसाच पण तसचं आहे…तो नाव विचारून थांबत नाही कारण त्याला आडनावावरून जात कळते… मग, कितीही शिका, कमवा, चांगलं वागा जात काय पिच्छा सोडतं नाही...याच्यावर एकचं उपाय आडनाव विचारायचं नाही…पण, मनाच्या कुठ्ल्यातरी कप्प्यात माणसाने जात लपवून ठेवलेलीच असते…जेव्हा आडनावावरून जात ओळखता येत नाही तेव्हा माणूस, त्याच्या खऱ्या लायकीवर उतरतो अन विचारतो हे अमुक तमुक तुमचे कोण हो? कोणी नाही वर सुद्धा हे थांबत नाहीत, अच्छा म्हणजे तुम्ही अमुक जातीचे का? म्हणून मनाच्या पिंजऱ्यातून पिल्लू सोडून देतात,… मग, काय समोरचा काय म्हणेल हो नाही वर त्या माणसाच आख्ख चरित्र मांडून रिकामे देखील होतात. वाह रे माणसा, "निर्लज्जपणा" हीच का तुझी जात राखणार आहेसं तू?…जग पुढे जातंय पण, तू अजूनही या जातींच्या जाळ्यात अडकून पडला आहेस…ग्लोबलायझेशन वाढत चाललय आता तरी तुझ्या डोळ्यांवरची जातीची जळमटे दूर सार अन माणसाला माणूस म्हणून किंमत दे…अरे, निर्दयी माणसा अजून किती पापं स्वतःच्या आत्म्यावर घेशील? पापात माखून निगरगट्टच झाला आहेस की रे तू, तुझ्या आत्म्याला या पापानेच नष्ट करणार आहेसं का रे तू ? तुझ्या पुढच्या पिढीला पण वारस्यात हेच पापं देणार आहेसं का रे मूर्ख माणसा?????

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment