Friday 6 June 2014

राजे परत या…


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला…स्वराज्य निर्मिती झाली…मुघलांचे कंबरडे मोडून त्यांना माती चारली…पण, या महान राजाने मुघलांच्या स्त्रियांना "आई"चा दर्जा दिला…"अशीच असती अमुची आई सुंदर रूपवती तर आम्हीही सुंदर झालो असतो…" म्हणून गौरवत सुरक्षितपणे मुघलांच्या स्वाधीन केले… आणि आज याच शिवरायांच्या मनात क्रोध, दुखः दाटून आले असेलं…आपल्याच स्त्रियांचा अपमान निमुटपणे पाहणाऱ्याना राजे काय शिक्षा देत असावेत? 
मला अजूनही आठवते, लहान असतांना बाबा एक गोष्ट नेहमी ऐकवायचे, एका विधवेवर पाटलाने हात टाकला म्हणून महाराजांनी त्याचे हात पाय छाटून त्याला सोडून दिले होते…अन आता फक्त मूकपणे बघण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत आजचे पुरुष? ना विरोध करतात, ना सुरक्षा… फक्त तमाशा बघतात…राजे आज तुम्ही असतात तर तुमच्या बहिणींवर अशी वेळचं आलीच नसती… राजे परत या, राजे परत या… समाजाला जागे करण्यासाठी…स्त्रियांचा मान ठेवण्यासाठी…बलात्कारयाना धडा शिकवण्यासाठी…महाराष्ट्रचच नव्हे तर या भारत देशाचं नंदनवन करण्यासाठी परत या राजे, परत या… आजचा तरुण फक्त तुमच्या जयंतीलाच जागा होतो, राज्याभिषेकाला छाती ताठ करत वाघासारखा चालतो पण, जेव्हा स्त्रिवर अत्याचार होत असतो तेव्हा मान खाली घालून, अळी मिळी करून मूग गिळून गप्पं बसतो…राजे यांच्या कणाकणातून आत्मविश्वास झळकवण्यासाठी परत या राजे, परत या…राजे खरचं परत या…

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment