Monday 2 June 2014

प्रियांश...३५

निरोपाच्या वेळी अगदी तोंडावर ही बाई अभद्र बोलली याचं काहीच नाही, पण, एक स्त्री असून तिला हृदयाच्या जागी पाषाणच तर नाही ना? हा विचार मनात येऊन गेला होता, तो अगदी अमुक दिवसापर्यंत मनात मारून टाकला, पण म्हणतात ना, "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही." मरणानंतरचा स्वर्ग कोणी पाहिला आहे का? म्हणून या आताच्या क्षणांत आपल्या माणसांचे लचके निघतील इतकं तोडायचं, रक्तबंबाळ करून निर्वस्त्र सोडून, निर्लज्जा प्रमाणे पुढे निघून जायचं…किती हा ताठपणा? कुठे घेऊन जाणार तिला? नक्कीच कोरड्या वाळवंटात जिथे कोणीच नसतं…ना माणूस…ना पाणी…असतो फक्त मूर्ख ताठपणातून आलेला "एकटेपणा"…काळ का कोणाला सांगून येतो ? काळ तर या जन्माच्या घड्याला पालथा करून कर्म चुकती करून सोडतो, तेही उधारी न ठेवता… 

प्रिया सातपुते 


No comments:

Post a Comment