Tuesday 26 July 2016

प्रियांश...७८

कधी कधी वाटत नेहमी मीच का समजून घेऊ, कधी कधी वाटत मीच का बोलु, कधी कधी वाटत मीच का !!!!!
हा विचार आपल्या सर्वांमध्ये येतंच राहतो. मग, हळूच एक विचार येतो आणि माझ्यात डोकावतो, माझ्यावर हसतो, चिडवतो, रडवतो सुद्धा!
पण, जे तो सांगतो ते एकूण सारा राग भुर्रकन उडून जातो...यालाच तर प्रेम म्हणतात...जे नाही केल तर सगळेच दूर निघून जातील... आयुष्य असंच असतं कधी रुसायचं, कधी रागवायचं, तर कधी सारं विसरून कान पकडून ढसाढसा रडायचं अन प्रेमाने मिठीत विसवायचं!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment