Sunday 3 August 2014

प्रियांश...४६

विधवा स्त्री अन अविवाहित स्त्री यांमध्ये दिसण्यात साम्य नसलं तरीही जास्ती असा फरक देखील नसतो…कारण, दोघींनाही समाज अजूनही परक धन, दुसऱ्या घरची मुलगी आणि सर्वात मुख्य म्हणजे ओझचं मानत आला आहे. बदल घडतोय हे जरी खर असलं तरी, समाजाच मन कधी खुल्ल होणार आहे? याच विषयावर मी अन माझी आई बोलत होतो, तेव्हा तिने एक जुनी गोष्ट सांगितली,…

माझ्या एका मावशीच लग्न ठरवण्याचा कार्यक्रम सुरु होता, मंडळी पुण्याची होती. बारकी आई हिरीरीने सारकाही पाहत होती, तोच मंडळी मधल्या बायकांनी सूर ओढला, "ही विधवाबाई कशाला पुढे पुढे करतेय? मंगल कार्यात विधवा कशाला पाहिजे? कळत नाही का तुम्हां लोकांना अपशकून होईल!" हे ऐकताच तात्याजी आणि आई खवळून उठले. आपल्या बहिणीला लावलेले बोल त्यांना खपले नाहीत. आई खंबीरपणे म्हणाली, "रोज सकाळी तिचा चेहरा पाहिल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही, आणि तुम्ही असं काय म्हणताय? आम्ही असलं काही मानत नाही. अन, अस बोललेलं चालणार नाही."

त्या काळात मुलीची पार्टी असूनही आई अशी तडफदारपणे बोलली, कोणाचीही तमा न बाळगता! त्या काळातले असूनही आईचा तो विचारी बाणा मनाला सुख देऊन गेला आणि मुख्य म्हणजे ती एका स्त्रिच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. आज उमगतंय आम्हां सर्व भावंडांमध्ये हा तडफदारपणा कोठून आला आहे ते. फिलिंग ग्रेट की आम्ही तुझ्या सावलीत लहानाचे मोठे झालोत. आज आई तू, तात्याजी अन बारकी आई स्थूलदेहाने जरी आमच्यापाशी नसलात तरीही आमच्या कणाकणात सामावलेले आहात. आता शब्द संपवते लिहू शकणार नाही… 

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment