Wednesday 26 February 2014

अध्यात्माचा पंच-२

                                                                         जय गुरुदेव!

आयुष्य खूप छोट आहे अन चिरंतन आहे.

हे वाक्य काही क्षणांपूर्वीच माझ्या वाचनात आलं. सात शब्दांच्या या वाक्यात बरंच काही दडल आहे. पहायला गेलं तर नवीन आयुष्यं अन नवा दृष्टीकोन. ज्याला हा अर्थ उमगला त्याला काशी काय स्वर्ग सुद्धा ठेंगणा होईलं. वाक्याच्या चार शब्दांमुळे आयुष्यात गती निर्माण होईलं, ते किती महत्वाने जगायचं हे उमगेल. आयुष्यं खूप छोट आहे म्हणून काही महाभाग ते वाटेल तसं जगायचं ठरवतील पण, तसं करू नका, पुढच्या तीन शब्दांमध्ये संपूर्ण जगाचं गमक लपलेले आहे. त्याचा थोडासा विचार करा! आयुष्य चिरंतन आहे, चिरंतन ज्याचा अंत नाही. विरोधाभासात गुंतू नका, आपण सगळेच एका चेतनेने अर्थात उर्जेने बनलेलो आहोत. काही त्याला आत्मा सुद्धा म्हणतील. ही चेतना कधीच लोप पावत नाही, एक शरीर थकलं कि ती दुसरया शरीरात प्रवेश करते, जसे आपण कपडे बदलतो तसचं काही ही चेतना सुद्धा करत असते. जेव्हा आपण हे अंतिम सत्य जाणतो, तेव्हा अधीरता, चालढकलपणा, आळशीपणा आणि आपण केलेल्या चांगल्या कामाची पोच पावती मिळवण्याची केविलवाणी अगतिकता पूर्णविराम पावते. 

तुम्ही एखाद्यासाठी मरमर मरून चांगलं काम केलं असेलं आणि तरी सुद्धा तुम्हाला साधा, "धन्यवाद" हा शब्द मिळाला नसेल किंवा कोणी तुमचा फायदा घेत असेलं, तरी सुद्धा उदास होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्ही जे पेराल तेच तुम्हांला मिळेल! तेही व्याजासहित! हाच निसर्गाचा नियम आहे. 

आयुष्याचा आनंद घ्या!

प्रिया सातपुते 

No comments:

Post a Comment