Monday 10 March 2014

प्रियांश...२३


माणूस हा प्राणीच असा आहे कि त्याला तहान लागल्यावरच विहिरीची आठवण होते पण, आजकाल विहिरी असतात कुठे, बिसलरी मिळाली कि माणूस तहान भागवून घेतो आणि त्याची खरी तहान काय होती हे विसरून जातो. सांगण्याच तात्पर्य हेचं कि माणसाला जाणीव होते मात्र काही थोड्यांनाच रस्ता सापडतो विहिरी पर्यंत पोहचायचा, आणि त्यातूनही काही जणांनाच विहीर सापडते. अन ती विहीर समोर असूनही पाणी पिणारे सुद्धा अल्पमतच आहेत. शेवटी प्रत्येकाने त्याचे त्यानेच ठरवायचे असते की त्याला कोणत पाणी हवं आहे. आता या पाण्याचे ज्याचे त्याने अर्थ काढून मोकळे व्हा पण थोडा मनातून विचार नक्की करा. 

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment