Tuesday 11 March 2014

अध्यात्माचा पंच-३

बरीच मित्रमंडळी म्हणत असतात, "चांगलं वाईट काही नसतं, आपणच त्या व्याख्या केलेल्या आहेत." इथे फक्त एकंच म्हणता येईलं, स्वतःच्या चुका दिसू नयेत किंवा स्वतःच्याच वर्तनाची लाज वाटते अशीच माणसे अश्या गोड पळवाटा शोधून काढून स्वतःच सांत्वन करतात. काय चांगलं अन काय वाईट हे ठरवण्याची बुद्धी परमेश्वराने सर्वांना दिलेलीच आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते

भगवान कृष्णाने, अर्जुनाने विचारलेल्या चांगल्या वाईट व्याखेवर काहीच न बोलता, मनुष्यामात्रांना एक जिवंत उदाहरणं तयार केलं. कृष्णाने युधिष्ठीर आणि दुर्योधन दोघांना एक कार्य दिलं. युधिष्ठीरला सांगण्यात आलं, "दिवस संपण्याच्या आत, एक दुष्ट, पापी माणसाला घेऊन माझ्यासमोर ये!" आणि दुर्योधनाला सांगण्यात आलं, "सुर्य अस्ताला जाण्याआधी तू एका सदगुणी, पवित्र माणसाला माझ्यासमोर उभा कर." दिवस मावळला, दुर्योधन त्रस्त डोक्याने , जीवाचा आटापिटा करत परत आला अन कृष्णाला म्हणाला, "मला एकही सदगुणी मनुष्य भेटला नाही, माधवा!" त्यावर कृष्णाने हलकेच हसून त्याला आराम करायला पाठवून दिले. तोच पांडू पुत्र युधिष्ठीर आला, त्याचा चेहरा शांत, प्रसन्न, हसरा होता! तो कृष्णाला म्हणाला,"हे, श्रीकृष्णा! मला कोणीच दुष्ट व्यक्ती दिसलीच नाही, सगळेच चांगले वाटले मला." युधिष्ठिराला निरोप देऊन, दुरून सर्व काही पाहणाऱ्या पार्थाला जवळ बोलावून भगवान श्रीकृष्णाने म्हंटले, "मनाने स्वच्छ, पवित्र, सदगुणी मनुष्याला सगळीकडेच पवित्रताच दिसते, त्याला सगळीकडे फक्त चांगलंच दिसत! पण, मनाने विशुद्ध मनुष्याला सगळीकडे पाप अन दुराचारच दिसतो! हीच व्याख्या आहे पार्था चांगल्या वायटाची.

आपण कोणत्या गटात जायचं हे प्रत्येकाला माहितच असतं, पण, दुसऱ्या गटाचे गुण स्वतःमध्ये कधीच उतरवू नका! इथे मी हे स्विकारून पुढे जातेय की साऱ्यांनाच चांगल्या गटातच जायचं आहे. 
"चांगलं पहाल तर चांगलचं घडेल!"

प्रिया सातपुते  

No comments:

Post a Comment