Wednesday 12 March 2014

अनुत्तरीत प्रश्न?


स्टार प्लस वर हल्ली एक नवीन सिरीज सुरु झाली आहे, "ईश्क़ किल्स" म्हणून…मी आणि वहिनी मराठी नाटकं पाहून उठणार इतक्यात, माझ्या नजरेस हे पडलं, पाहूया म्हणून आम्ही दोघी बसलो खऱ्या…पण, या विकृत नाटकात प्रेमाच्या नावावर सुरु असलेला हा वासनापट पाहून झटके नाही बसले कारण, आम्ही आमचे तर्क लावत होतो, आता खून होईल, मग होईल, पण, असं काही घडलं नाही. क्राईम पेट्रोल पाहून आपल्या सगळ्यांचीच डोकी थोडी जास्तीच चालतात हल्ली. विवाहबाह्य समंधांवर याआधी सुद्धा बरेचं चित्रपट, नाटके येउन गेली आहेत. मग, यात असं काय खासं होत की मी चक्कं या विषयाला हात घातला? 

सदर कुटुंब, श्रीमंत, नवरा-बायको आकंठ प्रेमात बुडालेले, इतकं सांर असूनही नवरा अथवा बायको स्वतःच्या नात्यात प्रामाणिक का राहू शकत नाहीत? जर खोलवर पाहिलं तर काहीजण मानसिक प्रेमाला आसुसलेले असतात, ते मग त्यांचा वेळ दारू, सोशल ग्येदरिंग्स, किटी पार्टी, मध्ये घालवू लागतात अन काही वासनेच्या आहारी जाऊन सगळंच उध्वस्त करून सोडतात. आणि या वासनेला "प्रेमाचं" लेबलं लाऊन मोकळे सुद्धा होतात. 

माणूस स्वतःला स्वैराचार करता यावा म्हणून लेबलं लावतो, इन ओपन रिलेशनशिप किंवा कॉम्पलीकेटेड…पण, विवाहीत माणसाच काय? तो तर काहीच लेबलं लावत नाही, शेवटी फिरून फिरून तो अथवा ती सुद्धा या ओपन रिलेशनशिपच्या जाळ्यात येऊन पडतात. काही त्यांच्या पार्टनरसना न कळता सार मारून नेतात, काही अडकतात अन कोर्टाच्या पायऱ्या चढतात. एवढ सगळ असूनही एक प्रश्न अनुत्तरीत राहतो, त्या पार्टनरची काय चूक? त्याने कुठे घोडं मारलं? तो किंवा ती तर प्रामाणिक होतीत ना? त्या तिसऱ्या व्यक्तीचं काय? माहित असूनही हा वासनेचा खेळ खेळताना त्यांना लाज कशी वाटत नाही? आणि समजा माहित नव्हत पण, कळल्यानंतरही डोळे कशे उघडतं नाहीत? जी व्यक्ती आयुष्यभराच्या आणाभाका घेऊन, विवाह नावाचं हे पवित्र बंधन चुटकीसरशी सोडू शकते मग त्या तिसऱ्या व्यक्तीला नाही का सोडू शकत? 

याची उत्तरे मिळण अवघडच आहे. एक कटूसत्य हेच की होरपळून निघते ती प्रामाणिक व्यक्तीचं!

देव सर्वांना सदबुद्धी देवो!

प्रिया सातपुते




No comments:

Post a Comment