Thursday 20 March 2014

प्रियांश...२५

आपण लहान असायचो तेव्हा आपण खरखुर आयुष्य जगलो, ना आपल्याला म्यानर्सची चिंता, ना कोण काय बोलेलं याची…पण, आता साधं आपण आपल्या  मामा, काकाच्या घरात जाताना सुद्धा कचरतो, टवाळक्या करत घरभर हिंडणारे आपण, आता बोलायला सुद्धा कचरतो…किती वेगळे होऊन जातो नाही का आपण? जुन्या वळणाच्या बायकांच्या तोंडून एकेकाळी ऐकलेले शब्द मग आठवतात, "आताच काय ते खेळतील ही, मग या भावांची लग्न झाली की पहा, पाय पण पडणार नाही घरात." हाय रे केवढा मोठा हा विपर्यास! हे थोडं विचित्र वाटलं तरीही खूप मोठ्ठं सत्यच आहे हे, मानवी वृत्तीचं बेढब सत्यं! कधी कधी हेचं वर्तन सगळ्यांच्या हिताचच असतं!

प्रिया सातपुते

No comments:

Post a Comment